शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

आपत्तींवर मात करुन जिल्हा पुन्हा सुजलाम् सुफलाम् करुया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST

रत्नागिरी : आपत्तीमागून आपत्ती झेलत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसोबत शासन व प्रशासन सदैव आहे आणि आपली भूमिका पार पाडत ...

रत्नागिरी : आपत्तीमागून आपत्ती झेलत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसोबत शासन व प्रशासन सदैव आहे आणि आपली भूमिका पार पाडत आहे. संकटांची ही मालिका संपवून आपण जिल्ह्याला पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् करुया, असे आवाहन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात केले.

येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस परेड मैदानावर हा ध्वजारोहण सोहळा झाला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री परब यांनी पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. अतिवृष्टी व दरड दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

पालकमंत्री परब म्हणाले की, कोरोनाच्या महामारीचा आपण गेल्या दीड वर्षापासून मुकाबला करतोय, आता व्यवहार सुरळीत होत असले तरी आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे व हातांची स्वच्छता ठेवणे या त्रिसुत्रीचे पालन सर्वांनी कोटकोरपणे करावे. कोरोनावर मात करण्यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करत आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत सर्व पूर्वतयारी प्रशासनाने केली आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या आपल्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ग्राम कृती दलांनी केलेल्या उत्तम कामामुळे जिल्ह्यातील १,५३४ गावांपैकी १,२१४ गावे काेरोनामुक्त झाली आहेत. ग्रामपंचायतींना यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के रक्कम खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

कोविडवरील उपचार व क्षमता वर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून ३० टक्के रक्कम म्हणजे ७५ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. ज्यातील ३८ कोटी रुपयांच्या रकमेला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. जिल्ह्यात ९२.४७ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा व निर्मिती होत आहे, हे खरोखर उल्लेखनीय काम आहे. ऑक्सिजन सिलिंडर्सची संख्याही ६६८पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौक्ते व अलिकडील अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत प्रत्येकवेळी शासन आपल्या पाठीशी उभे राहिले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना नुकसानभरपाई देताना सर्व निकष बदलून शासनाने मदत केली. यात १ लाख ९ हजार २२६ बाधितांना १५३ कोटी ७० लाख १६ हजार रुपये मागणीच्या १०० टक्के मदत वाटप पूर्ण झाले आहे. तौक्ते चक्रीवादळातील बाधितांना मदतीचेदेखील वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टीत बाधित गावांमधील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन निधीमधून ४ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.