शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गिरणी कामगार न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देऊ : प्रवीण घाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

दापोली : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रलंबित मागणीसाठी झालेल्या बैठकीत कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़़ गिरणी कामगारांना ...

दापोली : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रलंबित मागणीसाठी झालेल्या बैठकीत कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़़ गिरणी कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याची प्रतिक्रिया गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी दिली आहे.

गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नांवर ‘म्हाडा’मध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी म्हाडा मुख्य अधिकारी म्हसे, सह. मुख्य अधिकारी गोलांडे, मुख्य अभियंता व एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या २४१७ घरांचा ताबा देण्यासंबंधी चर्चा झाली तेव्हा म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हसे यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या घरासंबंधी देखभाल खर्च काेणी करायचा यासंबंधी निर्णय झाला नाही. येत्या १७ मे राेजी म्हाडा व एमएमआरडीए यांची बैठक या विषयावर राज्याचे मुख्य सचिव यांच्याजवळ घेण्यात येणार आहे. त्यावेळी हा विषय निकालात काढून पैसे भरलेल्या ६०० कामगारांना घरांचा ताबा देण्यात येईल तसेच उर्वरित कामगारांना पत्र ही वितरित केली जातील तसेच एमएमआरडीएची तयार २५७८ घरांची सोडत ही लवकरात लवकर काढण्यात येईल, असे स्पष्ट केले़

तसेच बॉम्बे डाईंग व श्रीनिवास घरांची काढलेल्या ३५०० घरांच्या सोडतीत यशस्वी झालेल्या कामगरांना प्रथम सूचनापत्र, मुंबई बँकेजवळ ॲग्रीमेंट प्रक्रिया पूर्ण होताच येत्या १० ते १५ दिवसांत कामगारांना वितरित केले जातील. पूर्वी हे पत्र बॅंकेत जमा करण्याची मुदत ४५ दिवसांची होती़ ती कोविडच्या कारणामुळे ३ महिन्यांची करण्यात येईल, असे सांगण्यात आले़

ज्या ६ गिरण्यांची सोडत सन २०१६ साली काढण्यात आली होती़ त्या घरांचा ताबा देण्याबाबत विचारण्यात आले़ त्यावेळी आजपर्यंत २२६१ कामगारांना ताबा देण्यात आला आहे उर्वरित प्रकरणे २ महिन्यांत पूर्ण केली जातील, अशी माहिती देण्यात आली़ सर्व कामगारांना म्हणजे आज केलेल्या १ लाख ७५ हजार कामगारांना घरे मिळावीत म्हणून कामगार संघटनेच्या नेत्यांनी पसंत केलेल्या जमिनीपैकी ४५ एकर जमिनीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहे, असे म्हसे यांनी सांगितले. यावेळी गिरणी कामगार कृती संघटनेचे जयश्री खाडिलकर, प्रवीण घाग, जय प्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई व नंदू पारकर हे नेते उपस्थित होते.