शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

पदाधिकाऱ्यांचीच बैठकीकडे पाठ

By admin | Updated: December 12, 2014 23:41 IST

चिपळूणमध्ये मीमांसा : राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीनंतरचे कवित्व सुरू...

चिपळूण : निवडणूक आली की, आपली ताकद आजमावण्यासाठी ५ वर्षे निष्ठेने राबणाऱ्या कार्यकर्त्याला मागे सारुन जातीपातीची गणित बांधून काही पदाधिकारी निवडून येतात. परंतु, निवडणूक झाल्यानंतर त्यांचा कुठेही प्रभाव जाणवत नाही. हे पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमाला किंवा बैठकांनाही हजर होत नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर बोलावलेल्या चिंतन बैठकीकडेही पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी गुरुवारी आत्मचिंतन बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी दांडी मारली होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात होता. तरीही पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, याचे आत्मचिंतन या बैठकीत होणे गरजेचे होते. परंतु, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले व गटनेते राजेश कदम, स्विकृत नगरसेवक इनायत मुकादमवगळता पक्षाचा निवडून आलेला एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. माजी सभापती सुरेश खापले, सभापती समीक्षा बागवेवगळता एकही पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषदेचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. मुळात पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपापल्या भागात फिरत नसल्याने या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आपले पदाधिकारी पक्षासाठी गावागावातून फिरत नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले, ही एक चांगली गोष्ट आहे. जाती-पातीचा निकष लावून निरुपद्रवी माणसे निवडून दिल्यानंतर पक्ष वाढणार कसा? हा प्रश्न आहे. भविष्यात यातून बोध घेऊन क्रियाशील कार्यकर्त्याला नेते संधी देतील. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्यांचे आपण देणे लागतो, याची जाणीव आजच्या पदाधिकाऱ्यांना राहिलेली नाही. आपण निवडून आलो म्हणजे आता आपले कोणी काही करु शकत नाही, अशा आविर्भावात ते राहात असल्याने सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटत चालली आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसतो. कारण खालच्या लोकप्रतिनिधींवरील राग लोकांनी त्या विधानसभा निवडणुकीत काढला आणि निकम यांच्यासारख्या उमेदवाराला त्याचा फटका बसला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मुळात पदाधिकाऱ्यांच्या बेदिलीमुळे पक्षाची घसरण होत आहे. याचा विचार आता वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा. एकेकाळी चिपळूण तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु, या तालुक्यात राष्ट्रवादीची घसरण होत आहे. हे थांबवायचे असेल तर ग्रामीण भागापासून संघटनात्मक बांधणीला सुरुवात करायला हवी. नेत्यांनी थेट संपर्क साधून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. अन्यथा ये रे माझ्या मागल्या... याप्रमाणे आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील. (प्रतिनिधी)साऱ्यांनाच चिंता एकीची...निवडणूक आली की, साऱ्यांसमोर असणारे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी चिंतन बैठकीकडे पाठ फिरवतात, याचे आश्चर्य व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीनंतर शहरात प्रतिक्रया उमटल्या आहेत. तालुकाध्यक्षांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला एका गटाने गैरहजेरी लावल्याने गटबाजीचे दर्शन घडले. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मतदारसंघात फिरत नसल्याचा ठपका.अनेक जिल्हा परिषद सदस्य नॉट रिचेबल. पक्षवाढीसाठी पुनर्रचना होणे गरजेचे. रमेश कदम, जयंद्रथ खताते यांनी दिल्या कानपिचक्या.संपर्कावर देणार भर.