शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कोकणात शेतीकडे तरुणांची पाठ...!

By admin | Updated: July 29, 2014 22:59 IST

पारंपरिक पध्दतीने शेती : वर्षभर पुरेल इतके धान्य पिकत नसल्याने शेतीकडे दुर्लक्ष

सुरेश पवार -दस्तुरी , कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते. येथील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवरच अवलंबून असते. ही शेती पारंपरिक पध्दतीने आजही पावसाच्या पाण्यावरच घेतली जाते. वर्षाकाठी केवळ भाताचेच पीक घेतले जाते. काही ठिकाणीच तूर, उडीद, वरी अशी पिके घेतली जातात. मुळात जमीन कातळाची असल्याने अन्य पिके घेण्यासाठी येथे कमी वाव आहे.पूर्वी भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. मात्र, प्रचंड मेहनत व कमी उत्पन्न यामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. प्रथम कवळ तोडणे, जमीन भाजणे, पेरणी करणे नंतर लावणी, बेणणी करणे, कापणी करणे आणि मळणी करणे. एवढी प्रक्रिया पार पाडून हाती काही क्विंटल तांदूळ पडतो. आपल्या शेतीतून पिकणाऱ्या भातावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होते. त्यामुळे मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी नोकरी करणे भाग पडते. पूर्वीप्रमाणे आता पाऊसदेखील वेळेवर व पुरेसा पडत नाही. त्याचबरोबर मजूर मिळणेही अवघड झाले आहे. पूर्वी एकत्र शेती व्हायची. आता ती पद्धत मोडत चालली आहे. शिवाय पावसाळा सोडला तर बैलांना वर्षभर खाण्यासाठी चाराही कमीच असतो. काही दिवसांच्या कामासाठी वर्षभर बैलांना सांभाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्याचबरोबर बैलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या असल्याने आता बैलजोडीही मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतीसाठी बैलही नाहीत तसेच शेतीच्या कामासाठी माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. त्यामुळे भावी पिढी शेतीकडे वळण्यापेक्षा उद्योगधंदे, नोकरीकडे वळत आहे. सध्या शेतीपेक्षा रोजगाराचे अन्य मार्ग सोयीचे वाटत असल्याने तरुणवर्ग शेती करण्यास फारसा इच्छुक नाही. त्यामुळे पुढील काही वर्षात कोकणातील पारंपरिक भातशेती टिकेल की नाही, याबाबत खात्री देता येत नाही.कोकणात भातशेती हा मुख्य पर्याय शेतकऱ्यांपुढे असल्याने यावर येथील शेतकऱ्यांची उलाढाल अवलंबून असते. आता भातशेतीही महागडी व न परवडणारी झाल्याने त्यात पारंपरिकतेचा वापर अधिक होऊ लागला आहे. या विषयात शासनाच्या विविध भागानी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोकणात शेती करणे हा वेगळा पर्याय आहे. शेतीला फळबागायतीचा उत्तम उपाय समोर असला तरी भातशेतीतून आर्थिक मेळ बसत नसल्याने नवा पर्याय तरूण स्वीकारतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे.तरूणाई भातशेतीकडे वळत नसल्याने तरूणांना पुन्हा या क्षेत्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू करणे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.