शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात शेतीकडे तरुणांची पाठ...!

By admin | Updated: July 29, 2014 22:59 IST

पारंपरिक पध्दतीने शेती : वर्षभर पुरेल इतके धान्य पिकत नसल्याने शेतीकडे दुर्लक्ष

सुरेश पवार -दस्तुरी , कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते. येथील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवरच अवलंबून असते. ही शेती पारंपरिक पध्दतीने आजही पावसाच्या पाण्यावरच घेतली जाते. वर्षाकाठी केवळ भाताचेच पीक घेतले जाते. काही ठिकाणीच तूर, उडीद, वरी अशी पिके घेतली जातात. मुळात जमीन कातळाची असल्याने अन्य पिके घेण्यासाठी येथे कमी वाव आहे.पूर्वी भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. मात्र, प्रचंड मेहनत व कमी उत्पन्न यामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. प्रथम कवळ तोडणे, जमीन भाजणे, पेरणी करणे नंतर लावणी, बेणणी करणे, कापणी करणे आणि मळणी करणे. एवढी प्रक्रिया पार पाडून हाती काही क्विंटल तांदूळ पडतो. आपल्या शेतीतून पिकणाऱ्या भातावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होते. त्यामुळे मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी नोकरी करणे भाग पडते. पूर्वीप्रमाणे आता पाऊसदेखील वेळेवर व पुरेसा पडत नाही. त्याचबरोबर मजूर मिळणेही अवघड झाले आहे. पूर्वी एकत्र शेती व्हायची. आता ती पद्धत मोडत चालली आहे. शिवाय पावसाळा सोडला तर बैलांना वर्षभर खाण्यासाठी चाराही कमीच असतो. काही दिवसांच्या कामासाठी वर्षभर बैलांना सांभाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्याचबरोबर बैलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या असल्याने आता बैलजोडीही मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतीसाठी बैलही नाहीत तसेच शेतीच्या कामासाठी माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. त्यामुळे भावी पिढी शेतीकडे वळण्यापेक्षा उद्योगधंदे, नोकरीकडे वळत आहे. सध्या शेतीपेक्षा रोजगाराचे अन्य मार्ग सोयीचे वाटत असल्याने तरुणवर्ग शेती करण्यास फारसा इच्छुक नाही. त्यामुळे पुढील काही वर्षात कोकणातील पारंपरिक भातशेती टिकेल की नाही, याबाबत खात्री देता येत नाही.कोकणात भातशेती हा मुख्य पर्याय शेतकऱ्यांपुढे असल्याने यावर येथील शेतकऱ्यांची उलाढाल अवलंबून असते. आता भातशेतीही महागडी व न परवडणारी झाल्याने त्यात पारंपरिकतेचा वापर अधिक होऊ लागला आहे. या विषयात शासनाच्या विविध भागानी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोकणात शेती करणे हा वेगळा पर्याय आहे. शेतीला फळबागायतीचा उत्तम उपाय समोर असला तरी भातशेतीतून आर्थिक मेळ बसत नसल्याने नवा पर्याय तरूण स्वीकारतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे.तरूणाई भातशेतीकडे वळत नसल्याने तरूणांना पुन्हा या क्षेत्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू करणे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.