शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

कोकणात शेतीकडे तरुणांची पाठ...!

By admin | Updated: July 29, 2014 22:59 IST

पारंपरिक पध्दतीने शेती : वर्षभर पुरेल इतके धान्य पिकत नसल्याने शेतीकडे दुर्लक्ष

सुरेश पवार -दस्तुरी , कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते. येथील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवरच अवलंबून असते. ही शेती पारंपरिक पध्दतीने आजही पावसाच्या पाण्यावरच घेतली जाते. वर्षाकाठी केवळ भाताचेच पीक घेतले जाते. काही ठिकाणीच तूर, उडीद, वरी अशी पिके घेतली जातात. मुळात जमीन कातळाची असल्याने अन्य पिके घेण्यासाठी येथे कमी वाव आहे.पूर्वी भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. मात्र, प्रचंड मेहनत व कमी उत्पन्न यामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. प्रथम कवळ तोडणे, जमीन भाजणे, पेरणी करणे नंतर लावणी, बेणणी करणे, कापणी करणे आणि मळणी करणे. एवढी प्रक्रिया पार पाडून हाती काही क्विंटल तांदूळ पडतो. आपल्या शेतीतून पिकणाऱ्या भातावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होते. त्यामुळे मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी नोकरी करणे भाग पडते. पूर्वीप्रमाणे आता पाऊसदेखील वेळेवर व पुरेसा पडत नाही. त्याचबरोबर मजूर मिळणेही अवघड झाले आहे. पूर्वी एकत्र शेती व्हायची. आता ती पद्धत मोडत चालली आहे. शिवाय पावसाळा सोडला तर बैलांना वर्षभर खाण्यासाठी चाराही कमीच असतो. काही दिवसांच्या कामासाठी वर्षभर बैलांना सांभाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्याचबरोबर बैलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या असल्याने आता बैलजोडीही मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतीसाठी बैलही नाहीत तसेच शेतीच्या कामासाठी माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. त्यामुळे भावी पिढी शेतीकडे वळण्यापेक्षा उद्योगधंदे, नोकरीकडे वळत आहे. सध्या शेतीपेक्षा रोजगाराचे अन्य मार्ग सोयीचे वाटत असल्याने तरुणवर्ग शेती करण्यास फारसा इच्छुक नाही. त्यामुळे पुढील काही वर्षात कोकणातील पारंपरिक भातशेती टिकेल की नाही, याबाबत खात्री देता येत नाही.कोकणात भातशेती हा मुख्य पर्याय शेतकऱ्यांपुढे असल्याने यावर येथील शेतकऱ्यांची उलाढाल अवलंबून असते. आता भातशेतीही महागडी व न परवडणारी झाल्याने त्यात पारंपरिकतेचा वापर अधिक होऊ लागला आहे. या विषयात शासनाच्या विविध भागानी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोकणात शेती करणे हा वेगळा पर्याय आहे. शेतीला फळबागायतीचा उत्तम उपाय समोर असला तरी भातशेतीतून आर्थिक मेळ बसत नसल्याने नवा पर्याय तरूण स्वीकारतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे.तरूणाई भातशेतीकडे वळत नसल्याने तरूणांना पुन्हा या क्षेत्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू करणे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.