शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

लोटे औद्योगिक वसाहतीत पाईपलाईनला गळती

By admin | Updated: May 19, 2016 00:13 IST

लोटे परिसर : संबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष

आवाशी : संपूर्ण राज्य दुष्काळाच्या गर्तेत सापडले असून, अनेकांचे पाण्याविना हाल होत आहेत. लोटे-परशुराम वसाहत व परिसराला पाणीपुरवठा करणारी खेर्डी, चिपळूण एमआयडीसीची पाईपलाईनला मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी गळती लागली आहे, असे असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील १२ गावांना खेर्डी -चिपळूण येथील एमआयडीसीकडून वालोपे येथून वाशिष्ठी नदीतील पाणी पुरवले जाते. वाशिष्ठी नदीतील पाणी थेट पीरलोटे येथील एमआयडीसीच्या साठवण टाकीत येते. प्रथम त्याच्यावर प्रक्रिया करून ते कारखानदार व १२ गावांच्या ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरवले जाते. रासायनिक कारखानदारीमुळे या १२ गावांमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत या गावातील जनतेनेदेखील पाण्याचा योग्य वापर करण्याचे सुरु केले आहे, तर औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखानदारही पाण्याच्या वापरावर कटाक्ष ठेवून आहेत. फेब्रुवारीपासूनच येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनने जागरूकता म्हणून ठिकठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. प्रत्येक कारखानदाराच्या दालनात याविषयी पाट्या लावण्यात आल्या आहेत. यावरून असे लक्षात येते की, पुरवठादरापेक्षा वापरणारा दक्ष आहे. मात्र, पुरवठादाराला याचे काहीच सोयरसुतक नाही.ज्या ठिकाणाहून औद्योगिक वसाहत व गावांना पाणीपुरवठा केला जातो, तेथून म्हणजेच पीरलोटे येथून पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. पीरलोटे येथील त्यांच्या पंप हाऊसमागे, महामार्ग पोलीस चौकी, पुष्कर कंपनीसमोर, सुप्रिया कंपनीसमोर, कन्साई कंपनीसमोर, बंद असणारी हरडेलिया कंपनी लगत व अशा अनेक ठिकाणी पाणी दिवसरात्र वाया जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दर सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असतो. मात्र, दुरुस्तीच्या दिवशी नेमके काय केले जाते, असा प्रश्न पडत आहे. दि. १६ रोजी सोमवार होता आणि मंगळवारीही पाणीपुरवठा बंद होता. मग असे असतानाही गळतीची ठिकाणे कामे तशीच राहावीत, असा सवाल उपस्थित होतो. याकामी जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथे होत असलेली पाण्याची गळती थांबवावीे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)तीव्र संताप : शेकडो लीटर पाणी वायाउर्वरित ठिकाणी भीषण पाणीटंचाई असताना लोटे परशुराम वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. दररोज शेकडो लिटर पाणी त्यामुळे वाया जात आहे. संबंधित यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याने हे लिकेज अद्याप तरी काढण्यात आलेले नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.