शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या लाईनला गळती

By admin | Updated: October 18, 2015 23:59 IST

गुहागर नगरपंचायत : वाढीव पाईपलाईनचे काम रेंगाळले

गुहागर : नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जनतेला ठरलेल्या वेळेत आवश्यक पाणी पुरवठा करण्याकरिता नळपाणी योजनेच्या वाढीव पाईपलाईन जोडणीचे काम मोठ्या दिमाखात सुरू झाले. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कामाची मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातच वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईनमुळे आज पाणी मिळेलच याचा भरवसा नाही. यामुळे नक्की हे काम जनतेसाठी की ठेकेदारासाठी असा सवाल केला जात आहे.गुहागर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्याने गुहागर शहरात मोठ्या प्रमाणात कामे होतील. एवढेच नव्हे; तर विकासाच्या वेगाबरोबर कामाचाही वेग वाढेल, असे चित्र जनतेच्या डोळ्यासमोर उभे करण्यात आले. परंतु, पाईपलाईन जोडणीच्या कामाकडे पाहून कामाच्या गतीचा अनुभव सध्या नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जनतेला येत आहे. गुहागर शहराचा विस्तार वाढत आहे. भविष्यकाळात नळपाणी पुरवठा योजनेद्वारे होणाऱ्या पाण्याच्या मागणीत वाढ होणार आहे. याकरिता आवश्यक ठिकाणी निर्धारित वेळेत जनतेला पाणी मिळण्यासाठी अनेक ठिकाणी वाढीव पाईपलाईन जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एमजीपाच्यावतीने या वाढलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात येत आहे. तब्बल ५१ लाख ५१ हजार ७०० रुपये खर्चाचे काम आहे. असगोली, कीर्तनवाडी, शिवाजी चौक, खरे-ढेरे महाविद्यालयासमोर पाईपलाईन वाढवण्याच्या कामाचे नियोजन आहे. पूर्वीची पाईपलाईन ही कास्टिंग तसेच सिमेंट पाईपलाईनची आहे. आता वाढवण्यात येणारी पाईपलाईन ही एसडीबी पाईपची आहे. त्यामुळे पाईपची सांधे जोडणी करण्याकरिता इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर केला जात आहे. पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात चर खोदण्यात आले. पाईपलाईनची सांधे जोडणीही केली. परंतु ही सांधेजोडणी निकृष्ट पद्धतीने केल्याने मुख्य पाईपलाईन फुटण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातेच, शिवाय जनतेला नळपाणी पुरवठा योजनेतून चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.नगरपंचायतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे जनतेला आश्वासन दिले अहे. मात्र, प्रत्यक्षात चिखलयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, यासाठी ओरड सुरू आहे. यातच पाईपलाईन फुटल्याने आज पाणी मिळेल, याची शाश्वती राहिली नाही. पाईपलाईनवर मीटर बसवण्याचे नियोजन नगरपंचायतीने केले आहे. परंतु जनतेला अर्धा ते पाऊण तास मिळणारे पाणीही वेळेत मिळत नाही. मग मीटर बसवून जनतेच्या पाण्याची व्यवस्था होईल का? आज दापोली व चिपळूण येथील पाण्यावर बसवण्यात आलेले मीटर अपयशी ठरले आहेत. सुदैवाने मोडकाआगर येथील धरणामुळे गुहागरवासीयांना पाण्याचे दुर्भिक्ष्य नाही. तरीही मीटर बसवण्याची घाई खरोखर जनतेच्या हितासाठीच का? असा सवालही उठत आहे. (प्रतिनिधी)कामाची सहा महिन्यांची मुदत संपलीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून देण्यात आलेल्या ठेक्याची मुदत सहा महिन्यांची असल्याचे या कामावर तांत्रिक मार्गदर्शन करणारे अहमद मुल्ला यांनी सांगितले. ठेकेदाराने वाढीव मुदत मागितली तर त्याला एकदा देता येते. वारंवार वाढीव मुदत देता येत नाही. तसेच अर्धवट कामामुळे दरदिवशी दंड स्वरूपात कर आकारणी ठेकेदारावर केली जाते, असे सांगितले. मात्र, ठेकेदारावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या कामामध्येच अनेक त्रुटी आहेत. हे काम जनतेच्या हितासाठी की, ठेकेदाराच्या फायद्यासाठी असा सवाल निर्माण होत आहे. या रेंगाळलेल्या कामाकडे नगरसेवकांनी लक्ष घालावे.