शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

वंचित आघाडी, बसपाचा फटका कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत ...

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या राजकीय लढाईच्या रिंगणात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी व हिंदू महासभा यांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे या पक्षांच्या आव्हानाचा खरा फटका प्रमुख तीन उमेदवारांपैकी कोणाला अधिक बसणार याबाबतची उत्कंठा आता वाढली आहे.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत व गेल्या वेळी या मतदारसंघात कॉँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेले व यावेळी स्वाभिमानतर्फे निवडणूक लढविणारे नीलेश राणे पुन्हा आमने- सामने आहेत.कॉँग्रेस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. निवडणुकीतील डावपेच म्हणून काही खेळी नेहमीच खेळल्या जातात. त्यानुसार काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उभे केले जातात. आपल्याला ज्यांचे सहकार्य मिळणार नाही, अशा मतदारांची मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू न देता ती अपक्ष वा अन्य उमेदवारांकडे कशी वळवता येतील, असा या डावपेचांमागे उद्देश असतो.रत्नागिरी मतदारसंघात गेल्यावेळी युतीतर्फे लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दीड लाखांचे मताधिक्य मिळाले होते, तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघात सेनेचे स्वत:चे मताधिक्य १ लाखावर आले. त्यामुळे या निवडणुकीत या १ लाख मताधिक्यात घट झाली तरीही विनायक राऊत यांना विजयापासून रोखता येणार नाही, असा सेनेचा दावा आहे. तर हे मताधिक्य पोखरण्यासाठी काही अपक्ष व अन्य आघाड्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची चर्चा आहे.रत्नागिरी - देवरुख येथील मारूती जोशी हे उमेदवार यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. बहुजन समाजात त्यांना मानणारे लोकही आहेत. परंतु ते या मतदारसंघात विजयापर्यंत पोहोचू शकतील काय, हा राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना मिळणारी मते ही मुख्य पक्षांच्या उमेदवारांची घटणारी मते असू शकतात.दुसरीकडे बहुुजन समाज पार्टीनेही वेंगुर्ल्याचे किशोर वरक यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचीही या मतदारसंघात मते आहेत. हिंदू महासभेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.