शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

वंचित आघाडी, बसपाचा फटका कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत ...

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या राजकीय लढाईच्या रिंगणात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी व हिंदू महासभा यांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे या पक्षांच्या आव्हानाचा खरा फटका प्रमुख तीन उमेदवारांपैकी कोणाला अधिक बसणार याबाबतची उत्कंठा आता वाढली आहे.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत व गेल्या वेळी या मतदारसंघात कॉँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेले व यावेळी स्वाभिमानतर्फे निवडणूक लढविणारे नीलेश राणे पुन्हा आमने- सामने आहेत.कॉँग्रेस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. निवडणुकीतील डावपेच म्हणून काही खेळी नेहमीच खेळल्या जातात. त्यानुसार काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उभे केले जातात. आपल्याला ज्यांचे सहकार्य मिळणार नाही, अशा मतदारांची मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू न देता ती अपक्ष वा अन्य उमेदवारांकडे कशी वळवता येतील, असा या डावपेचांमागे उद्देश असतो.रत्नागिरी मतदारसंघात गेल्यावेळी युतीतर्फे लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दीड लाखांचे मताधिक्य मिळाले होते, तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघात सेनेचे स्वत:चे मताधिक्य १ लाखावर आले. त्यामुळे या निवडणुकीत या १ लाख मताधिक्यात घट झाली तरीही विनायक राऊत यांना विजयापासून रोखता येणार नाही, असा सेनेचा दावा आहे. तर हे मताधिक्य पोखरण्यासाठी काही अपक्ष व अन्य आघाड्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची चर्चा आहे.रत्नागिरी - देवरुख येथील मारूती जोशी हे उमेदवार यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. बहुजन समाजात त्यांना मानणारे लोकही आहेत. परंतु ते या मतदारसंघात विजयापर्यंत पोहोचू शकतील काय, हा राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना मिळणारी मते ही मुख्य पक्षांच्या उमेदवारांची घटणारी मते असू शकतात.दुसरीकडे बहुुजन समाज पार्टीनेही वेंगुर्ल्याचे किशोर वरक यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचीही या मतदारसंघात मते आहेत. हिंदू महासभेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.