शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सर्वेक्षण अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

वाहनांची कोंडी खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ...

वाहनांची कोंडी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. आधीच दोन्ही बाजूकडून एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यात आंबवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

‘बेस्ट टीचर्स’ म्हणून सन्मानित

रत्नागिरी : लीफ फाॅरवर्ड या संस्थेकडून तालुक्यातील बसणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था रत्नागिरीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा घाग यांना ‘बेस्ट टीचर्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. मुलांचा उत्तम सहभाग व प्रगतीचा आलेख पाहून लीफ फाॅरवर्ड या संस्थेकडून बसणी शाळा व शिक्षिका घाग यांना गाैरविण्यात आले.

टिके ग्रामपंचायतीतर्फे सर्वेक्षण

रत्नागिरी : तालुक्यातील टिके ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सरपंच साक्षी फुटक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन गट स्थापन करण्यात आले असून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची ऑक्सिजन पातळी, तापमान, सहा मिनिटे वाॅक टेस्ट घेण्याचे नियोजन करून तपासणी सुरू आहे.

मातोश्री ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा

खेड : तालुक्यातील संगलट येथील चार वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष व मातोश्री सेवादान आरोग्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त तसेच पाणीदूत मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून चार वाड्यांसाठी दीड महिना पाण्याचा टॅंकर उपलब्ध केला आहे.

आरोग्य केंद्राचा आढावा

खेड : तालुक्यातील आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोरोना साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. आमदार योगेश कदम यांनी माहिती घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे उपस्थित होते.

पालशेतमध्ये निर्बंध

गुहागर : परजिल्ह्यातून येणारे चाकरमानी व इतर नागरिकांसाठी पालशेत ग्रामपंचायतीने कडक निर्बंध लागू केले आहेत. ॲन्टिजन टेस्टसह पाच दिवसांचा क्वारंटाईनचा नियम करण्यात आला असून त्यांची व्यवस्था गावाच्या मराठी शाळेमध्ये करण्यात आली आहे.

नालेसफाई सुरू

रत्नागिरी : पावसाळा तोंडावर असल्याने रत्नागिरी नगरपरिषदेकडून नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू असून, पावसाळ्यात शहरातील एकही नाला तुंबू द्यायचा नाही, असा निर्धार नगरपरिषदेने केला आहे. नागरिकांच्या अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी सोडविण्यात येत आहेत.

लसीकरणात सुसूत्रता आणावी

चिपळूण : कोरोना लसीकरणासाठी तालुका आरोग्य विभागाने योग्य नियाेजन केलेले नाही, तालुका आरोग्य विभागाने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आली आहे. ज्येष्ठांना प्रथमप्राधान्य देण्यात यावे. शिवाय ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य द्यावे.

बाजारपेठेत गर्दी

रत्नागिरी : तालुक्यातील पावस परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढतच आहे. शासनाचे कडक निर्बंध असतानाही सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी विशेष गर्दी होत आहेच.