शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दरडमुक्त सह्याद्री अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

चिपळूण : सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दरडमुक्त सह्याद्री अभियानाचा शुभारंभ आमदार ...

चिपळूण : सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दरडमुक्त सह्याद्री अभियानाचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दरड उत्पात आणि पुराचे संकट’ या विषयावर आंगवली पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि प्रमुख ग्रामस्थांबरोबर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वनालिका या अणेराव ॲग्रो फार्मच्या मारळ येथे पार पडली.

आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले की, चिपळूणमधील तिवरे गावातील बांबूच्या बेटांमुळे दरड उत्पातातून वाचलेली घरे मी डोळ्याने पाहून आलो आहे. त्यामुळे मातीची धूप आणि दरड उत्पात रोखण्यासाठी बांबूसारख्या स्थानिक प्रजातींची लागवड हाच सर्वोत्तम उपाय आहे असे सांगितले. त्यांच्या हस्ते बांबूच्या रोपांचे रोपण करून दरडमुक्त सह्याद्री अभियानाची सुरुवात झाली. सृष्टीज्ञान संस्थेच्या या कामात लागेल ती सर्व शासकीय तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या संपूर्ण जगाला ग्रासलेल्या समस्यांचे पडसाद कोकणातही अनुभवायला मिळत आहेत. अनियमित पाऊस, ढगफुटी, पूर, वादळांची वारंवारता अशा आपत्ती नित्याचा भाग होऊन गेल्या आहेत.

अगदी यावर्षी सुद्धा जूनच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या तौक्ते वादळाने कोकणची दाणादाण उडवून दिली. दि. २१, २२ आणि २३ जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने कोकणात दाखवलेले निसर्गाचे रूप खूपच भयावह होते. यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि सह्याद्री संकल्प सोसायटी संस्थेचे अध्यक्ष संजीव अणेराव यांच्या पुढाकाराने दरड उत्पाताची कारणे समजून घेणे व त्यावर उपाययोजना आखण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सृष्टीज्ञान संस्थेचे अध्यक्ष विजय जावळेकर आणि अशोक अणेराव यांनी या करारनाम्यावर स्वाक्षरी केली आणि त्याच्या प्रती आमदार शेखर निकम यांनी त्यांना प्रदान केल्या. या परिषदेला जिल्हा परिषद सदस्य मुग्धा जागुष्टे तसेच संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने उपस्थित होते.