शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

दंडापोटी २५ लाख जमा तीन वर्षात २२,८०३ केसेस दाखल

By admin | Updated: May 24, 2014 01:09 IST

नियमांचे होतेय वारंवार उल्लंघन

सुभाष कदम ल्ल चिपळूण मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६वर गेल्या तीन वर्षांत विविध गुन्हे करणार्‍या २२ हजार ८०३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व अशा चालकांना २४ लाख ७३ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई कशेडी वाहतूक मदत केंद्रातर्फे करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भागवत यांनी दिली. महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पत्रकारांच्या कृती समितीने आंदोलन केले होते. मोरवंडे ते कशेडी दरम्याने असणारा महामार्ग वळणावळणाचा व घाटाचा आहे. या रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज नसताना अनेक चालक बेदरकारपणे वाहने चालवून अपघातास निमंत्रण देतात. यात अनेक बेकसूर लोक मारले जातात. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होतात. महामर्गावर कार किंवा लहान गाड्या चालविणार्‍या चालकांची घाई मोठी असते. ‘अति घाई, संकटात नेई’ याची जाणीव असतानाही नवशिक्षित किंवा प्रशिक्षण न घेतलेले चालक कशीही गाडी घुसवून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अतिउत्साह त्यांना नडतो. हे असे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. सीट बेल्ट न लावणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे., दारु पिऊन वाहन चालविणे, गाडीत कागदपत्र न ठेवणे किंवा कागदपत्र गहाळ होणे, विमा, पीयुसी नसणे, तांत्रिक बिघाड असणे, वाहतुकीचे नियम तोडणे यामुळे वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. तीन वर्षांत पोलिसांनी २२ हजार ८०३ केसेस करुन २४ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलीस सातत्याने कारवाई करुनही वाहन चालकांच्या वर्तनात फारसा बदल आढळत नाही. त्यामुळे सातत्याने ही कारवाईची प्रक्रिया सुरुच राहाते. सध्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालकांना वाहतूक पोलीस पुरेशा सूचना देतात. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. पोलिसांकडून चुका करणार्‍या मोटार वाहन चालकांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. महामार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बांधण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. सज्ज रुग्णवाहिका ठेवलेल्या असतात. शासनस्तरावर चौपदरीकरणाचे कामही प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहनचालकानी नियमांचे पालन केल्यास व सावधानतेने वाहन चालविल्यास अपघातचे प्रमाण नियंत्रित होऊ शकते.