शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

दंडापोटी २५ लाख जमा तीन वर्षात २२,८०३ केसेस दाखल

By admin | Updated: May 24, 2014 01:09 IST

नियमांचे होतेय वारंवार उल्लंघन

सुभाष कदम ल्ल चिपळूण मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६वर गेल्या तीन वर्षांत विविध गुन्हे करणार्‍या २२ हजार ८०३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व अशा चालकांना २४ लाख ७३ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई कशेडी वाहतूक मदत केंद्रातर्फे करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भागवत यांनी दिली. महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पत्रकारांच्या कृती समितीने आंदोलन केले होते. मोरवंडे ते कशेडी दरम्याने असणारा महामार्ग वळणावळणाचा व घाटाचा आहे. या रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज नसताना अनेक चालक बेदरकारपणे वाहने चालवून अपघातास निमंत्रण देतात. यात अनेक बेकसूर लोक मारले जातात. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होतात. महामर्गावर कार किंवा लहान गाड्या चालविणार्‍या चालकांची घाई मोठी असते. ‘अति घाई, संकटात नेई’ याची जाणीव असतानाही नवशिक्षित किंवा प्रशिक्षण न घेतलेले चालक कशीही गाडी घुसवून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अतिउत्साह त्यांना नडतो. हे असे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. सीट बेल्ट न लावणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे., दारु पिऊन वाहन चालविणे, गाडीत कागदपत्र न ठेवणे किंवा कागदपत्र गहाळ होणे, विमा, पीयुसी नसणे, तांत्रिक बिघाड असणे, वाहतुकीचे नियम तोडणे यामुळे वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. तीन वर्षांत पोलिसांनी २२ हजार ८०३ केसेस करुन २४ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलीस सातत्याने कारवाई करुनही वाहन चालकांच्या वर्तनात फारसा बदल आढळत नाही. त्यामुळे सातत्याने ही कारवाईची प्रक्रिया सुरुच राहाते. सध्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालकांना वाहतूक पोलीस पुरेशा सूचना देतात. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. पोलिसांकडून चुका करणार्‍या मोटार वाहन चालकांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. महामार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बांधण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. सज्ज रुग्णवाहिका ठेवलेल्या असतात. शासनस्तरावर चौपदरीकरणाचे कामही प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहनचालकानी नियमांचे पालन केल्यास व सावधानतेने वाहन चालविल्यास अपघातचे प्रमाण नियंत्रित होऊ शकते.