शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

मिरजोळेतील शेतजमिनीमध्ये मोठे भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

रत्नागिरी : सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन ...

रत्नागिरी

: सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन १५ ते २० फूट खोल खचली आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडीदरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतकरी आता चांगलेच हवालदिल झाले आहेत. अपुऱ्या निधीमुळे गेली तीन वर्षे याबाबतच्या उपाययोजना रखडल्या असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त कला जात आहे.

सततच्या भूस्खलनामुळे येथील शेती

संकटात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने येथील

शेतजमिनीत सुमारे १५-२० फूट खोल खचली. वर्षागणिक येथील एक-एक

शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर येथे दिसत चित्र आहे. पंधरा वर्षात आतापर्यंत लागवडीखालचे ६ ते ७ एकर क्षेत्र हातचे गेले आहे.

येथील नदीच्या

प्रवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली.सन २००६ पूर्वीपासून येथील या प्रकाराला सुरूवात झाली. २००६ मध्ये तर याठिकाणी मोठे भूस्खलन झाले. त्यात ५-६ शेतकऱ्यांची

शेत जमीन नामशेष झाली. त्यावेळी बाधित असलेले सुमारे २ एकर क्षेत्र आता दरवर्षीच्या भूस्खलनामुळे सुमारे ६ ते ७ एकर इतके वाढले आहे.

सातत्याने घडणाऱ्या या प्रकाराची दखल घेत भूवैज्ञानिकांनी पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन स्तरावरून

काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.

सन २०१९ मध्ये पाटबंधारे विभाग स्तरावरून येथील १ कोटी ३५ लाखांचा

प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे

पाठवण्यात आला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता.

त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी

विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले

होते त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र निधीअभावी अजूनही काम रखडले आहे.

हे भूस्खलन रोखण्यासाठी गेली तीन वर्षे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सातत्याने भूस्खलन सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या भूस्खलनामध्ये येथील भाऊ भाटवडेकर

यांची शेतजमीन खोलवर खचली आहे. त्यांचे शेत उद्ध्वस्त झालेले आहे.

आणखी अतिवृष्टी झाल्यास लगतच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनींनाही मोठा धोका

आहे. मात्र त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.