शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मिरजोळेतील शेतजमिनीमध्ये मोठे भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

रत्नागिरी : सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन ...

रत्नागिरी

: सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन १५ ते २० फूट खोल खचली आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडीदरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतकरी आता चांगलेच हवालदिल झाले आहेत. अपुऱ्या निधीमुळे गेली तीन वर्षे याबाबतच्या उपाययोजना रखडल्या असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त कला जात आहे.

सततच्या भूस्खलनामुळे येथील शेती

संकटात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने येथील

शेतजमिनीत सुमारे १५-२० फूट खोल खचली. वर्षागणिक येथील एक-एक

शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर येथे दिसत चित्र आहे. पंधरा वर्षात आतापर्यंत लागवडीखालचे ६ ते ७ एकर क्षेत्र हातचे गेले आहे.

येथील नदीच्या

प्रवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली.सन २००६ पूर्वीपासून येथील या प्रकाराला सुरूवात झाली. २००६ मध्ये तर याठिकाणी मोठे भूस्खलन झाले. त्यात ५-६ शेतकऱ्यांची

शेत जमीन नामशेष झाली. त्यावेळी बाधित असलेले सुमारे २ एकर क्षेत्र आता दरवर्षीच्या भूस्खलनामुळे सुमारे ६ ते ७ एकर इतके वाढले आहे.

सातत्याने घडणाऱ्या या प्रकाराची दखल घेत भूवैज्ञानिकांनी पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन स्तरावरून

काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.

सन २०१९ मध्ये पाटबंधारे विभाग स्तरावरून येथील १ कोटी ३५ लाखांचा

प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे

पाठवण्यात आला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता.

त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी

विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले

होते त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र निधीअभावी अजूनही काम रखडले आहे.

हे भूस्खलन रोखण्यासाठी गेली तीन वर्षे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सातत्याने भूस्खलन सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या भूस्खलनामध्ये येथील भाऊ भाटवडेकर

यांची शेतजमीन खोलवर खचली आहे. त्यांचे शेत उद्ध्वस्त झालेले आहे.

आणखी अतिवृष्टी झाल्यास लगतच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनींनाही मोठा धोका

आहे. मात्र त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.