शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरजोळेतील शेतजमिनीमध्ये मोठे भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

रत्नागिरी : सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन ...

रत्नागिरी

: सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन १५ ते २० फूट खोल खचली आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडीदरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतकरी आता चांगलेच हवालदिल झाले आहेत. अपुऱ्या निधीमुळे गेली तीन वर्षे याबाबतच्या उपाययोजना रखडल्या असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त कला जात आहे.

सततच्या भूस्खलनामुळे येथील शेती

संकटात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने येथील

शेतजमिनीत सुमारे १५-२० फूट खोल खचली. वर्षागणिक येथील एक-एक

शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर येथे दिसत चित्र आहे. पंधरा वर्षात आतापर्यंत लागवडीखालचे ६ ते ७ एकर क्षेत्र हातचे गेले आहे.

येथील नदीच्या

प्रवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली.सन २००६ पूर्वीपासून येथील या प्रकाराला सुरूवात झाली. २००६ मध्ये तर याठिकाणी मोठे भूस्खलन झाले. त्यात ५-६ शेतकऱ्यांची

शेत जमीन नामशेष झाली. त्यावेळी बाधित असलेले सुमारे २ एकर क्षेत्र आता दरवर्षीच्या भूस्खलनामुळे सुमारे ६ ते ७ एकर इतके वाढले आहे.

सातत्याने घडणाऱ्या या प्रकाराची दखल घेत भूवैज्ञानिकांनी पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन स्तरावरून

काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.

सन २०१९ मध्ये पाटबंधारे विभाग स्तरावरून येथील १ कोटी ३५ लाखांचा

प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे

पाठवण्यात आला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता.

त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी

विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले

होते त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र निधीअभावी अजूनही काम रखडले आहे.

हे भूस्खलन रोखण्यासाठी गेली तीन वर्षे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सातत्याने भूस्खलन सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या भूस्खलनामध्ये येथील भाऊ भाटवडेकर

यांची शेतजमीन खोलवर खचली आहे. त्यांचे शेत उद्ध्वस्त झालेले आहे.

आणखी अतिवृष्टी झाल्यास लगतच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनींनाही मोठा धोका

आहे. मात्र त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.