शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लांजा, संगमेश्वरचे टँकर भागवताहेत राजापूरची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या गावातील नळपाणी योजना बंद झाली आहे़ ...

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या गावातील नळपाणी योजना बंद झाली आहे़ दरम्यान, तालुका प्रशासनाने लांजा आणि संगमेश्वर येथून प्रत्येकी एकेक असे दोन शासकीय टँकर आणून काही गावांना मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

ताैक्ते वादळाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विद्युत वितरण विभागाला बसला आहे़ तालुक्याच्या पश्चिम परिसरात तर वादळाने वितरण विभागाचे मोठे नुकसान केले आहे़ त्या परिसरातील अनेक गावांतील नळपाणी योजना विद्युत पुरवठा बंद असल्याने ठप्प झाल्या आहेत़ त्यामुळे पाणीपुरवठा न झाल्याने त्या गावातील जनता त्रस्त झाली आहे़ दरम्यान, पाण्यासाठी होत असलेली वाढती मागणी पाहून तालुका प्रशासनाने लांजा व संगमेश्वर येथून प्रत्येकी एकेक असे दोन शासकीय टँकर मागविले आहेत़ प्रशासनाच्या सूचनेनुसार बुधवारी अणसुरे, जैतापूर, दळे व माडबन या गावांसाठी टँकर पाठविण्यात आले. उर्वरित गावांनाही पाणीपुरवठा टँकरने केला जाणार आहे़ अजून काही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत़ प्रशासनाने त्याची दखल घेताना आणखी एखादा टँकर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

दरम्यान, विद्युत वितरणचे कर्मचारी जोमाने काम करीत असून तुटलेल्या तारा व पडलेले विद्युत खांब उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामध्येही अडचणी येत असल्या तरी पुढील एक-दोन दिवसांत तालुक्याच्या पश्चिम भागातील खंडित विद्युत पुरवठा सुरळीत कसा सुरू होईल त्यासाठी वितरण विभाग झटत आहे़ त्यानुसार वीजपुरवठा सुरू झाल्यास विजेअभावी बंद पडलेल्या नळपाणी योजना पूर्ववत सुरू होतील आणि तेथील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.