शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

लॅण्डलाइन सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

दापोली : तालुक्यातील केळशी परिसर तसेच उटंबर आडे, पाडले, लोणवडी आदी गावांमध्ये बीएसएनएलची लॅण्डलाइन सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांची ...

दापोली : तालुक्यातील केळशी परिसर तसेच उटंबर आडे, पाडले, लोणवडी आदी गावांमध्ये बीएसएनएलची लॅण्डलाइन सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. आठवडाभर ही सेवा बंद राहिल्याने इतर ठिकाणी संपर्क करणे अवघड होत आहे.

जैतापकर यांचा सत्कार

गुहागर : ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आणि निर्मलक्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथे कलामंचाचे उपाध्यक्ष रमेश भेकरे आणि सचिव रमेश कोकमकर यांनी जैतापकर यांचा सत्कार केला.

रुग्णसंख्या वाढली

राजापूर : कोरोनाची रुग्णसंख्या तालुक्यात भरमसाठ वाढू लागली आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या ५०० च्या जवळपास पोहोचली आहे. सुमारे ७० गावातील हे रुग्ण आहेत. सध्या वाढत्या संख्येने तालुकावासीयांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

रक्तदान शिबिर

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही भासत आहे. जिल्हा रुग्णालयाला असलेल्या रक्ताची गरज लक्षात घेऊन युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षाप्रमाणे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

तारण योजना

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पीक तारण कर्ज योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून काजू बी व सुपारीला बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम, ६ टक्के व्याजदराने उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ढगाळ वातावरण

देवरुख : सकाळी दाट धुके आणि त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण, दुपारनंतर असह्य उकाडा अशा संमिश्र वातावरणाने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून असे वेगवेगळे वातावरण सुरू झाले आहे.

रस्त्याची धूप

राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली येथे एसटी स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाडीचे पाणी येत असल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. रस्त्याची तटबंदी कोसळल्यामुळे हे खारे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे खराब झालेला हा रस्ता आणि या ठिकाणी कोसळलेला धक्का यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे.

दूषित पाणीपुरवठा

रत्नागिरी : शहरात गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. बुधवारी तिसऱ्या दिवशी जेमतेम अर्धा तास पाणी आले. मात्र विविध भागांमध्ये आलेले गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे.

खत पुरवठ्याची मागणी

रत्नागिरी : अवकाळीचा तडाखा आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीतही खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नवोदय परीक्षा १६ मे रोजी

रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा शनिवार १० एप्रिल रोजी आयोजित केली होती. ही प्रवेश परीक्षा कोरोना संसर्गामुळे आता १६ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बदलाची नोंद घ्यावी, असे या विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.