शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

हर्णे बंदरात पाच बोटी बुडून लाखो रुपयांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:19 IST

कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे१0 खलाशाना वाचविण्यात यश तीन खलाशी अजूनही बेपत्ता फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळापाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्यादुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प

दापोली, दि. १९ : कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या पाच बोटीतील १0 खलाशाना बाहेर काढण्यात स्थानिक मच्छिमार बांधवाना यश आले असून काही मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत, परंतु  फुलचंद भय्या, दिपचंद भय्या आणि कैलाश जुवरकर हे तीन खलाशी सकाळपासून बेपत्ता आहेत.

हर्णे बंदरात जेटीची मागणी मच्छिमार बांधव गेली ३५ वर्षापासून मागणी करत आहेत, परंतु हर्णे बंदरातील जेटीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी मच्छिमार बांधवाना आपल्या बोटी आंजर्ले खाडीत किंवा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला उभ्या कराव्या लागत आहेत, जेटी अभावी वादळ सदृश्य परिस्थितीत मच्छिमार बांधवाची कधी बोट बुडते तर कधी प्राणसुद्धा गमवावा लागत आहे. 

मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाºयासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून यामुळे भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे.  दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण ३४६१ मिमी पाऊस झाला आहे.

आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवाव्यात. प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी राहावे. आपत्कालीन परिस्थिती आढळून आल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी केले आहे.

दरम्यान, मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांना जोडणाºया मांदीवली पलावरुन भारजी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. तिडे व तळेघर या दोन गावांना जोडणाºया कुंबळे येथील कॉजवे वरुनही पाणी गेले असून सकाळपासुन वीज पुरवठाही खंडीत झाले आहे. दुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प आहे.