शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

हर्णे बंदरात पाच बोटी बुडून लाखो रुपयांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:19 IST

कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे१0 खलाशाना वाचविण्यात यश तीन खलाशी अजूनही बेपत्ता फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळापाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्यादुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प

दापोली, दि. १९ : कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या पाच बोटीतील १0 खलाशाना बाहेर काढण्यात स्थानिक मच्छिमार बांधवाना यश आले असून काही मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत, परंतु  फुलचंद भय्या, दिपचंद भय्या आणि कैलाश जुवरकर हे तीन खलाशी सकाळपासून बेपत्ता आहेत.

हर्णे बंदरात जेटीची मागणी मच्छिमार बांधव गेली ३५ वर्षापासून मागणी करत आहेत, परंतु हर्णे बंदरातील जेटीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी मच्छिमार बांधवाना आपल्या बोटी आंजर्ले खाडीत किंवा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला उभ्या कराव्या लागत आहेत, जेटी अभावी वादळ सदृश्य परिस्थितीत मच्छिमार बांधवाची कधी बोट बुडते तर कधी प्राणसुद्धा गमवावा लागत आहे. 

मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाºयासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून यामुळे भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे.  दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण ३४६१ मिमी पाऊस झाला आहे.

आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवाव्यात. प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी राहावे. आपत्कालीन परिस्थिती आढळून आल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी केले आहे.

दरम्यान, मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांना जोडणाºया मांदीवली पलावरुन भारजी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. तिडे व तळेघर या दोन गावांना जोडणाºया कुंबळे येथील कॉजवे वरुनही पाणी गेले असून सकाळपासुन वीज पुरवठाही खंडीत झाले आहे. दुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प आहे.