शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाेकमंच : कठाेर आणि करुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

कुणालाही फार पायपीट करावी लागणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. अत्यावश्यक बाबी अंगणापर्यंत, आवारापर्यंत घरपोहोच मिळणे याला पर्याय नाही. ...

कुणालाही फार पायपीट करावी लागणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. अत्यावश्यक बाबी अंगणापर्यंत, आवारापर्यंत घरपोहोच मिळणे याला पर्याय नाही. आधीच कोरोनामुळे धास्तावलेल्या समाजाला धीर आणि आनंद देणे हे माध्यमांचे काम होय.

तसेच एकूण आरोग्य आणीबाणी लक्षात घेता, समजा, रिक्षावाल्यांना काही आर्थिक मदत मिळणार असेल तर त्यातही परवाना न बघता, पण रिक्षाचालक संघटनेकडून माहिती घेऊन ती सरसकट केली तर त्यात अधिक माणुसकी आहे.

अनाथ बालकांनाही दत्तक घेतले जाते. सोसायटी संस्कृती कोकणातही आता बरीच वाढली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व आसपास सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. मात्र, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याप्रमाणे सहृदय, पण सजग राहून कारभार करावा. आज समजा एखादा पदाधिकारी क्रूरपणे वागला, तरी त्याला नंतर त्या सोसायटीतच राहायचे असते आणि कोरोना संकट तर कुणावरही कधीही आदळू शकते. म्हणूनच समंजसपणाला पर्याय नाही. आता प्रत्येकजण एकटा, अलिप्त, सिंगल आहे. कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तर विशेष धन्यवाद द्यावे लागतील.

पोलीस अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर तर सर्वाधिक ताण आहे. तो दिसत नाही, पण नंतर वेगवेगळ्या आजारांच्या रूपात निघू शकतो. तरीही, काही ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी इतक्या समजुतीने वागत असतात, एवढा संयम बाळगत असतात की, वाटते, केवळ प्रशिक्षणामुळे हे घडणार नाही, तर त्यांच्या कुटुंबाचेही चांगले संस्कार त्यांच्यावर वाढत्या वयात झालेले आहेत. त्यांच्या शिक्षकांकडेही त्याचे श्रेय जाते. रस्त्याने भटकणारा वेडासुद्धा कोरोनाचा प्रसारक ठरू शकतो. त्यालाही मास्क द्यावा लागेल. तो मास्क वापरतोय का ते बघावे लागेल. शेवटी हे ‘युद्ध’ आहे! व्हायरसवॉर. जरी शिस्त असली, तरी दयामाया हवीच!

- माधव गवाणकर, रत्नागिरी