शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

लांजात पाणीटंचाई आणखी तीव्र होणार

By admin | Updated: May 3, 2016 00:51 IST

काळ्या ढगांकडे डोळे : केवळ एक टँकर आणखी किती लोकांची तहान भागवणार-- दुष्काळ दाह

अनिल कासारे-- लांजा -कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तालुक्यातील नद्या, विहिरी, तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. जिल्ह्यात प्रथमच चिंचुर्टी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्ये पाण्याची झळ पोहोचली आहे, तर काही दिवसात ७ गावे १७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकच टँकर सध्या पाणीपुरवठा करत आहे.तालुक्यातील पूर्व भागातील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, या वाडी-वस्त्यांना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून टंचाईला सुरुवात होते. पाऊस पडेपर्यंत येथे पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईची झळ पोहोचली आणि जिल्ह्यात पहिला टँकर धावला.सध्या पालू - चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एकूण ४८ घरे असून, १५८ लोकवस्ती आहे. या घरांना दिनांक १७ मार्चपासून दररोज पालू हुंबरवणे - १०८ लोकवस्ती ४७ घरे, दिनांक ६ एप्रिलपासून एक दिवसाआड करून, कोचरी - भोजवाडी १२३ लोकवस्ती, ३५ घरे, दिनांक २२ मार्चपासून एक दिवसाआड, गोळवशी - खांबडवाडी २७२ लोकवस्ती, ६२ घरे यांना दिनांक २ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ६६१ लोकवस्ती असलेल्या १८२ घरांना सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.मार्च महिन्यापासून लांजा तालुक्यातील ३ गावे ४ वाड्या पाण्यासाठी वणवण करत असताना प्रशासनाकडून पाणीपुरवठा करणारा ५ हजार लीटरचा टँकर पाठवला जात आहे. चिंचुर्टीमध्ये दररोज, तर इतर ३ वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीमध्ये घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओळखून विवली - राईधनगरवाडी, गवाणे - रामाणेवाडी, कणगवली - शिंदेवाडी, पालू - नामेवाडी, पानली खालचीवाडी, वीसघर कमिटी, रामवाडी, दंडावरची वाडी, खाकेवाडी, गावकरवाडी, बौद्धवाडी, कोचरी - बेंंद्रेवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, डाफळेवाडी, धनगरवाडी, वाडगाव - हसोळ - कोंडवाडी एकूण ७ गावे १७ वाड्यांना मे महिन्यात पाणीटंचाई भीषण होणार असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे मागणीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे पुढे १० गावे २१ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे गावांच्या संख्येत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्येच पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र, ७ गावे १७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अधिक गावे व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या एका टँकरने ३ गावांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. मात्र, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये वाढ होणार असल्याने एक टँकर एवढ्या गावामध्ये पाणीपुरवठा करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने अजून दोन टँकरची व्यवस्था करून पाणीटंचाईचे संकट दूर करावे, अशी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या नद्या, विहिरी, तलावांच्या पाणी पातळीमध्ये घट होत असल्याने संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कसे निपटावे, हीच चिंता लोकांना लागून राहिली आहे.