शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

लांजात पाणीटंचाई आणखी तीव्र होणार

By admin | Updated: May 3, 2016 00:51 IST

काळ्या ढगांकडे डोळे : केवळ एक टँकर आणखी किती लोकांची तहान भागवणार-- दुष्काळ दाह

अनिल कासारे-- लांजा -कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तालुक्यातील नद्या, विहिरी, तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. जिल्ह्यात प्रथमच चिंचुर्टी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्ये पाण्याची झळ पोहोचली आहे, तर काही दिवसात ७ गावे १७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकच टँकर सध्या पाणीपुरवठा करत आहे.तालुक्यातील पूर्व भागातील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, या वाडी-वस्त्यांना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून टंचाईला सुरुवात होते. पाऊस पडेपर्यंत येथे पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईची झळ पोहोचली आणि जिल्ह्यात पहिला टँकर धावला.सध्या पालू - चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एकूण ४८ घरे असून, १५८ लोकवस्ती आहे. या घरांना दिनांक १७ मार्चपासून दररोज पालू हुंबरवणे - १०८ लोकवस्ती ४७ घरे, दिनांक ६ एप्रिलपासून एक दिवसाआड करून, कोचरी - भोजवाडी १२३ लोकवस्ती, ३५ घरे, दिनांक २२ मार्चपासून एक दिवसाआड, गोळवशी - खांबडवाडी २७२ लोकवस्ती, ६२ घरे यांना दिनांक २ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ६६१ लोकवस्ती असलेल्या १८२ घरांना सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.मार्च महिन्यापासून लांजा तालुक्यातील ३ गावे ४ वाड्या पाण्यासाठी वणवण करत असताना प्रशासनाकडून पाणीपुरवठा करणारा ५ हजार लीटरचा टँकर पाठवला जात आहे. चिंचुर्टीमध्ये दररोज, तर इतर ३ वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीमध्ये घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओळखून विवली - राईधनगरवाडी, गवाणे - रामाणेवाडी, कणगवली - शिंदेवाडी, पालू - नामेवाडी, पानली खालचीवाडी, वीसघर कमिटी, रामवाडी, दंडावरची वाडी, खाकेवाडी, गावकरवाडी, बौद्धवाडी, कोचरी - बेंंद्रेवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, डाफळेवाडी, धनगरवाडी, वाडगाव - हसोळ - कोंडवाडी एकूण ७ गावे १७ वाड्यांना मे महिन्यात पाणीटंचाई भीषण होणार असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे मागणीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे पुढे १० गावे २१ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे गावांच्या संख्येत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्येच पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र, ७ गावे १७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अधिक गावे व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या एका टँकरने ३ गावांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. मात्र, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये वाढ होणार असल्याने एक टँकर एवढ्या गावामध्ये पाणीपुरवठा करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने अजून दोन टँकरची व्यवस्था करून पाणीटंचाईचे संकट दूर करावे, अशी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या नद्या, विहिरी, तलावांच्या पाणी पातळीमध्ये घट होत असल्याने संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कसे निपटावे, हीच चिंता लोकांना लागून राहिली आहे.