शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

परीक्षा यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव : परीक्षार्थींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षभरात विविध कारणांनी चारवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात विविध कारणांनी चारवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. १४ मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करताच राज्यभरात जन आंदोलन उभारले. अखेर शासनाने नमते घेत रविवार दि.२१ मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला, मात्र आरआरबी (रेल्वे प्रशासन) च्या परीक्षाही एकाच दिवशी दि.२१ मार्च रोजी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एकाच परीक्षेला बसावे लागणार आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा करता यावी, यासाठी लोकसेवा आयोगासह रेल्वे सारख्या तत्सम परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी करीत असतात. मात्र एकाच दिवशी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शुल्क वाया जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून जिल्ह्यात एकूण तीन परीक्षा केंद्र आहेत. १२९१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. वर्षभरात चार वेळा परीक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र रविवारी परीक्षा असल्याने विद्यार्थीही सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे बैठक व्यवस्थेबाबत दक्षता घेण्यात आली आहे.

आरआरबी परीक्षेची तारीख पूर्वनियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार दि. १४ मार्चला होणार होती. शासनाने परीक्षा रद्द करतानाच राज्यभरात जनआंदोलन उसळले. अखेर शासनाने घाईगडबडीने दि.२१ रोजी परीक्षा जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून एकावेळी एकच परीक्षा देता येणार आहे.

गेली अनेक वर्षे पदभरती फारच कमी संख्येने करण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आरआरबी व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी असल्याने अनेकांचे परीक्षेसाठी भरलेले शुल्क वाया गेले आहे.

-प्रभाकर धोपट, खंडाळा

आधीच बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या परीक्षार्थींचे नुकसान झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. दोन पैकी कोणती तरी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीच्या संधी आधीच कमी असताना या नव्या घोळामुळे मानसिकतेवर परिणाम होत आहे.

- कल्पेश घवाळी, हर्चे