शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

परीक्षा यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव : परीक्षार्थींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षभरात विविध कारणांनी चारवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात विविध कारणांनी चारवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. १४ मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करताच राज्यभरात जन आंदोलन उभारले. अखेर शासनाने नमते घेत रविवार दि.२१ मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला, मात्र आरआरबी (रेल्वे प्रशासन) च्या परीक्षाही एकाच दिवशी दि.२१ मार्च रोजी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एकाच परीक्षेला बसावे लागणार आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा करता यावी, यासाठी लोकसेवा आयोगासह रेल्वे सारख्या तत्सम परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी करीत असतात. मात्र एकाच दिवशी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शुल्क वाया जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून जिल्ह्यात एकूण तीन परीक्षा केंद्र आहेत. १२९१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. वर्षभरात चार वेळा परीक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र रविवारी परीक्षा असल्याने विद्यार्थीही सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे बैठक व्यवस्थेबाबत दक्षता घेण्यात आली आहे.

आरआरबी परीक्षेची तारीख पूर्वनियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार दि. १४ मार्चला होणार होती. शासनाने परीक्षा रद्द करतानाच राज्यभरात जनआंदोलन उसळले. अखेर शासनाने घाईगडबडीने दि.२१ रोजी परीक्षा जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून एकावेळी एकच परीक्षा देता येणार आहे.

गेली अनेक वर्षे पदभरती फारच कमी संख्येने करण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आरआरबी व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी असल्याने अनेकांचे परीक्षेसाठी भरलेले शुल्क वाया गेले आहे.

-प्रभाकर धोपट, खंडाळा

आधीच बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या परीक्षार्थींचे नुकसान झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. दोन पैकी कोणती तरी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीच्या संधी आधीच कमी असताना या नव्या घोळामुळे मानसिकतेवर परिणाम होत आहे.

- कल्पेश घवाळी, हर्चे