शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

आंब्याची चव चाखणेही कुवतीपलिकड

By admin | Updated: April 17, 2015 00:05 IST

कमी उत्पादन : चिपळुणात डझनाला ९०० रूपये, सामान्यांना होतोय आंबा महाग े

असुर्डे : स्थानिक बाजारपेठेत दरवर्षी मुबलक नसेल पण सर्वसमान्यांना परवडेल, अशा दरात आंबा उपलब्ध होत असे. मात्र, अवकाळी पावसामुळे कोकणात यंदा आंबापिकाचे बरेच नुकसान झाले आहे. भाव गगनाला भिडला असल्याने आंबा विकत घेऊन खाणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे.अवकाळी पावसाने बागायतदार हवालदील झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत केवळ ३० टक्के आंबा बाजारात विक्रीसाठी जाईल, असे या भागातील स्थानिक बागायतदार सांगत आहेत. युरोपसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आंब्यासाठी खुली झाल्यामुळे चांगल्या प्रतिच्या आंब्याची निर्यात होणार आहे़ चिपळूण शहर, ग्रामीण भागात व आठवडा बाजारातही सावर्डे, खेर्डी बाजारात ७०० ते ९०० रुपये डझन अशा भावाने विक्री सुरू आहे. परप्रांतीय विक्रेते आंब्याची किरकोळ विक्री करण्यासाठी घरोघरी जाताना पूर्वी दिसायचे.चढते भाव व अल्प मागणी यामुळे तेही यावर्षी गायब झाले आहेत़ याला पर्याय म्हणून लोक रायवळी आंबे खरेदी करायचे. मात्र, रायवळी आंबाही बाजारात तुरळक प्रमाणात दिसत आहेत़ तेही चढ्या भावाने विक्री होताना दिसत आहे. दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी म्हणून हापूसऐवजी रायवळी आंबे लोक घेऊ लागले आहेत. रायवळ आंब्याचे पीकही ३५ टक्के एवढेच आले आहे. त्यामुळे दरवर्षी समोर पडलेला झाडाखालील आंबा न उचलणारे लोक आता त्यालाही तरसू लागले आहेत. कर्नाटकहून येणारा नीलम, रत्ना तसेच उत्तरेकडील आंब्याच्या दरातही यावर्षी दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे़ त्यामुळे हापूसची चव चाखणे हे कुवतीबाहेर असल्याचे सर्वसामान्य ग्राहकांतून बोलले जात आहे़ (प्रतिनिधी)