शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची चव चाखणेही कुवतीपलिकड

By admin | Updated: April 17, 2015 00:05 IST

कमी उत्पादन : चिपळुणात डझनाला ९०० रूपये, सामान्यांना होतोय आंबा महाग े

असुर्डे : स्थानिक बाजारपेठेत दरवर्षी मुबलक नसेल पण सर्वसमान्यांना परवडेल, अशा दरात आंबा उपलब्ध होत असे. मात्र, अवकाळी पावसामुळे कोकणात यंदा आंबापिकाचे बरेच नुकसान झाले आहे. भाव गगनाला भिडला असल्याने आंबा विकत घेऊन खाणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे.अवकाळी पावसाने बागायतदार हवालदील झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत केवळ ३० टक्के आंबा बाजारात विक्रीसाठी जाईल, असे या भागातील स्थानिक बागायतदार सांगत आहेत. युरोपसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आंब्यासाठी खुली झाल्यामुळे चांगल्या प्रतिच्या आंब्याची निर्यात होणार आहे़ चिपळूण शहर, ग्रामीण भागात व आठवडा बाजारातही सावर्डे, खेर्डी बाजारात ७०० ते ९०० रुपये डझन अशा भावाने विक्री सुरू आहे. परप्रांतीय विक्रेते आंब्याची किरकोळ विक्री करण्यासाठी घरोघरी जाताना पूर्वी दिसायचे.चढते भाव व अल्प मागणी यामुळे तेही यावर्षी गायब झाले आहेत़ याला पर्याय म्हणून लोक रायवळी आंबे खरेदी करायचे. मात्र, रायवळी आंबाही बाजारात तुरळक प्रमाणात दिसत आहेत़ तेही चढ्या भावाने विक्री होताना दिसत आहे. दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी म्हणून हापूसऐवजी रायवळी आंबे लोक घेऊ लागले आहेत. रायवळ आंब्याचे पीकही ३५ टक्के एवढेच आले आहे. त्यामुळे दरवर्षी समोर पडलेला झाडाखालील आंबा न उचलणारे लोक आता त्यालाही तरसू लागले आहेत. कर्नाटकहून येणारा नीलम, रत्ना तसेच उत्तरेकडील आंब्याच्या दरातही यावर्षी दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे़ त्यामुळे हापूसची चव चाखणे हे कुवतीबाहेर असल्याचे सर्वसामान्य ग्राहकांतून बोलले जात आहे़ (प्रतिनिधी)