शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी कोकण रेल्वे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही बिघडलेलेच आहे. जादा गाड्यांचे कारण दिले जात असले तरी दररोज मार्गावरून धावणाºया ८ मालगाड्या व ५ रो-रो गाड्यांबाबत योग्य नियोजन केले नसल्यानेही प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. महामार्गावर ज्याप्रमाणे अवजड वाहनांची वाहतूक काही काळ थांबविली जाते त्याप्रमाणेच गणेशोत्सव काळात कोकण ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही बिघडलेलेच आहे. जादा गाड्यांचे कारण दिले जात असले तरी दररोज मार्गावरून धावणाºया ८ मालगाड्या व ५ रो-रो गाड्यांबाबत योग्य नियोजन केले नसल्यानेही प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. महामार्गावर ज्याप्रमाणे अवजड वाहनांची वाहतूक काही काळ थांबविली जाते त्याप्रमाणेच गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे मत आहे.कोकण रेल्वे मार्गावर दररोज ५० पेक्षा अधिक नियमितपणे धावणाºया गाड्या आहेत. गणेशोत्सव काळात भक्तांसाठी कोकण रेल्वे व मध्य रेल्वेने २५० जादा फेºयांची सोय केली. याबाबत प्रवाशांमध्ये समाधान आहे. मात्र, जादा गाड्या सोडल्याने क्रॉसिंगला वेळ जात असल्याने गाड्यांना उशीर होत असल्याचे जे कारण सांगितले जात आहे, ते अर्धसत्य आहे. जादा गाड्यांबरोबरच दररोज मार्गावर धावणाºया मालवाहू गाड्यांची संख्या उत्सव काळात काही दिवस कमी करणे किंवा थांबविणे याबाबत कोकण रेल्वेने नियोजन करण्याची आवश्यकता होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.मार्गावर अनेक ठिकाणी मालवाहू रेल्वे गाड्यांना क्रॉसिंग देण्यासाठी अनेक प्रवासी गाड्या काही स्थानकांवर तास तासभर उभ्या करून ठेवल्या जात आहेत. प्रवासी गाड्यांच्या क्रॉसिंगबाबतही हीच स्थिती आहे. यातील मालवाहू गाड्यांची संख्या उत्सवकाळात काही प्रमाणात कमी करता आली असती तरीही प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बºयापैकी सावरता आले असते. याबाबत पुढील उत्सवांच्या काळात कोकण रेल्वेकडून नियोजन अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रियाही प्रवाशांनी व्यक्त केल्या.