शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

अणुस्कुरा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

राजापूर : गेले काही दिवस अणुस्कुरा घाटमार्गे कोकणातील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढल्याने संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे ...

राजापूर : गेले काही दिवस अणुस्कुरा घाटमार्गे कोकणातील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढल्याने संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. गणेशोत्सवाच्या काळात होणारी वाहनांची गर्दी पाहता यामार्गे अवजड वाहनांना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी वाढू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत कोकण - कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात पडझड होऊन तो घाट वाहतुकीला बंद करण्यात आला होता. शिवाय कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे अन्य घाटही धोकादायक बनल्याने अणुस्कुरा या एकमेव घाटमार्गे वाहतुक सुरू असल्याने गेल्या काही दिवसांत अणुस्कुरा घाटमार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये रत्नागिरीसह गुहागर, देवरुख, लांजा, राजापूर आगाराची एसटी वाहतूक या मार्गे सुरू आहे. कोकणात येणारी सर्व प्रकारची मालवाहतूक, पेट्रोल, डिझेल, गॅस वाहतूक करणारी वाहने जळाऊ लाकडांची वाहतूक व सर्व प्रकारची खासगी वाहतूकही याच मार्गाने होत आहे. त्यामुळे मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. मात्र, काही ठिकाणचे खड्डे तसेच असल्याने चाकरमान्यांसह स्थानिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. ओणी-अणुस्कुरामार्गे कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहतूक गणेशोत्सव काळात काही दिवस बंद ठेवावी, अशी मागणी आता लोक करत आहेत. किमान सणासुदीच्या दिवसात तरी हे बुजवले जाणार आहेत का नाही, असाही संतप्त प्रश्नही लोक करत आहेत. या मार्गावरील रायपाटण - पाचलला जोडणाऱ्या निवळ वहाळावरील पूल व रायपाटण येथील मोरी यांच्या भक्कमपणाबद्दल आता शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात या पुलासह मोरीचीही दुरुस्ती करावी लागणार आहे.