शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

'कोकणचा राजा' हरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील जून महिन्यातील निसर्ग वादळानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे आधीचा आंब्याचा मोहोर ...

गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील जून महिन्यातील निसर्ग वादळानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे आधीचा आंब्याचा मोहोर गळून पडला. त्यानंतर पुन्हा पीक आले होते. एवढेच नव्हे तर आंबा उतरवण्याचीही तयारी सुरू झाली होती. अशातच तोंडात आलेला घास तौक्ते वादळाने काढून घ्यावा, अशी स्थिती झाली आहे. काही गावांना तर वादळीवाऱ्यासह पावसानेही झोडपून काढले. त्यामुळे आता आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. कारण, हापूस आंब्याचे उत्पादन करण्यासाठी खते, फवारण्या, कामगार, लाकडी पेट्या, पॅकिंगचा खर्च येत असतो. त्यासाठी साधारण हजार-बाराशे रुपये खर्च आणि आंबे विकल्यानंतर केवळ सातशे-आठशे रुपये उत्पन्न मिळणार असेल, तर तो व्यवसाय कशाला असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रचंड परिश्रम करून अनेकदा शेतकऱ्याला वर्षाच्या शेवटी नुकसान होते आणि कर्जही वाढते. कारण, आधुनिक पद्धतीने आंबा पीक घेताना येथील शेतकऱ्याला प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत, शिवाय पैसाही तितकाच खर्च करावा लागत आहे. त्यासाठी विमा संरक्षण काही शेतकरी घेत असले, तरी त्यातून तुटपुंजी रक्कम हाती लागते. मुळात कोकणातील स्वाभिमानी शेतकरी सरकारकडे कधीच कर्जमाफी, नुकसानभरपाई मागत नाही आणि सरकारी यंत्रणा त्याला कधी मदतही करत नाही. तरीही, स्वयंपूर्ण पद्धतीने वर्षानुवर्षे कोकणातील आंबा बागायतदार काम करीत आहे. परंतु, आता कोरोनाच्या परिस्थितीत केवळ 'लढ' म्हणण्यापेक्षा सरकारने आर्थिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे. तरच हा शेतकरी तरू शकतो. अन्यथा, नव्याने आंबा लागवड करून या व्यवसायात उतरलेला तरुणवर्ग यामध्ये टिकाव धरू शकत नाही. त्यासाठी कोकणातील शेतकरी आणि हापूस आंब्याची शेती याचे दीर्घकालीन नियोजन करून जगाला भुरळ घालणारा हापूस आंबा पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात कसा येईल आणि कोकणातील स्वाभिमानी शेतकरी आर्थिक समृद्ध जीवन कसे जगू शकेल, याचे प्रदीर्घ नियोजन केले पाहिजे.