शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

...हा तर ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचा प्रकार : शौकत मुकादम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

चिपळूण : ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशाच लोकांना ग्रामसभांना बसता येईल, असे आदेश सरकारने दिले आहेत. हा एक ...

चिपळूण : ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशाच लोकांना ग्रामसभांना बसता येईल, असे आदेश सरकारने दिले आहेत. हा एक प्रकारे ग्रामीण भागातील गावामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार असल्याचे मत पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.

काही गावांची लोकसंख्या ४ हजार, ५ हजार आहे. तिथे भीक घातल्यासारखे ५० ते १०० डोस दिले जातात. लोकसंख्येच्या मानाने शासनाकडून डोसच दिले जात नाही. मग लोक डोस घेणार कसे, एखाद्या व्यक्तीने एक डोस घेतला असेल आणि दुसरा डोस शासनाकडून उपलब्ध झाला नसेल, तर त्यात लोकांचा काय दोष? ग्रामीण भागामध्ये काही सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसभेला उपस्थित राहणारे कार्य अधिकारी यांनी डोस घेतलेले नाहीत. आधी गावातील लोकांना डोस मिळू दे, वयोवृद्धांना घेऊ दे, मग आम्ही घेऊ, असे त्यांनी मोठ्या मनाने सांगितल्यामुळे गावातील ६० टक्के लोक डोस घेण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे दोन डोसची अट घालून शासनाने ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला आहे, असे ते म्हणाले.

परमिट रूम, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी प्रवेशाला दोन डोसची अट आहे का, मग ग्रामीण भागामध्ये ही अट कशासाठी, एखाद्या व्यक्तीचे टेंपरेचर व पल्स टेस्ट करून ग्रामसभेला बसण्यास परवानगी देण्यास हरकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. सर्वात प्रथम गावामध्ये राहणाऱ्या लोकांचे लसीकरण पूर्ण करा व मग ग्रामसभा घ्या. नको ते कायदे काढून ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचे थांबवा, असेही मुकादम यांनी सांगितले.