शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

खाडीपट्टा परिसर अविकसितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:06 IST

ग्रामस्थांची मागणी : नंदनवन नको, निदान सोयी सुविधा द्या

खेड : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सुमारे २३ गावे मूलभूत सोयी व सुविधांपासून वंचित राहिली आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा भाग अविकसित राहिला आहे. येथील रस्ते तर सतत वाळूच्या वाहतुकीने पूर्णपणे उखडले आहेत. पाण्याअभावी येथील जनतेचे हाल होत आहेत. आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांनी या विभागाच्या विकासासाठी केलेल्या घोषणा निष्प्रभ ठरल्याने सुमारे २३ गावे असलेला हा विभाग अद्याप अविकसित राहिला आहे. या विभागाचे ‘नंदनवन नको निदान मूलभूत सोयी सुविधा द्या’ अशी ओरड येथील जनतेची माफक अपेक्षा आहे. निसर्गाने नटलेला खाडीपट्टा विभाग पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. परिसर निसर्गसंपन्न आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अनेकवेळा या विभागाला सोसावा लागला. वर्षभर वाहणारी जगबुडी नदी आणि जोडीलाच दाभोळ खाडी यामुळे या विभागातील मत्स्य व्यावसायिक आणि वाळू व्यावसायीक आपला जेमतेम उदरनिर्वाह करीत आहेत. येथील जंगलमय भागात असलेली जैवविविधता आणि औषधी वनस्पती हे या विभागाचे खास वैशिष्ट्य आहे. नदी आणि खाडी किनारी असलेल्या झोपड्या तसेच वस्त्या आजही अविकसित आहेत. जगबुडी नदी, दाभोळ खाडी आणि वाशिष्ठी नदीच्या संगमावरच बहीरवली येथे मुघलकालीन दिवा बेट आहे. निसर्गप्रेमी आणि जलपर्यटन प्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे.़ खाडीपट्ट्यातील दुर्लक्षित राहिलेला हा भूभाग आणि येथे असलेले ऐतिहासिक अवशेष पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे आहेत. हा गावचा मोठा ठेवा आहे. तो जतन करून विकसित करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.हिंदू व मुस्लिम धर्मिय लोक येथे सलोख्याने राहतात, ही या विभागाची स्वतंत्र ओळख आहे. खेड शहरापासून सुमारे २५ ते ३५ किलोमीटर अंतरावर हा विभाग विस्तारल्याने शिक्षणाच्या तशा सुविधा कमी आहेत. उन्हाळ्यातही जगबुडी नदी आणि खाडीतील पाण्यामुळे या विभागात गारवा वाटतो. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ आणि दाट वनराई यामुळे खाडीपट्ट्याकडे पर्यटकांनाही पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल, त्यादृष्टीने विभागातील २३ गावांतील ४५ हजार लोकवस्तीसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे. (प्रतिनिधी)घोषणा हवेतच : पर्यटनस्थळ सोडाच; मूलभूत सुविधाही नाहीतखाडीपट्टा विभाग आता गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांनी निवडणुकीवेळी एका जाहीर सभेत हा विभाग पर्यटनस्थळ करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र पर्यटनस्थळ सोडाच, या विभागात मूलभूत सोयीसुविधाही नाहीत. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या दिवा बेटापर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ता नाही, तसेच पन्हाळजे मार्गाची कमालीची दुरवस्था झाली आहे. वाळू उत्खनननदीकिनारच्या वस्त्यांकडे ये-जा करणेसाठी रस्ते, पाणी व दळणवळणाच्या अन्य सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे कोणी पर्यटक या बेट किंवा पन्हाळजेपर्यंत फिरकत नाहीत. या विभागातील अमर्याद वाळू उत्खननामुळे हा परिसर वाळूमाफियांचा भाग म्हणून नवीन ओळख होत आहे.