शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

केतकीत एस. आर. तंत्रज्ञान मार्गदर्शन

By admin | Updated: June 17, 2015 00:37 IST

दादा गरंडे : कोकणातील शेतकऱ्यांना भात लागवडीतील तंत्राच्या टीप्स दिल्यास फायदा

चिपळूण : कोकणामध्ये खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भातपीक पद्धतीत बदल सुचवण्यात आहेत. जमिनीची उकल, बेर आणि चिखलणी करून लावणी न लावता गादी वाफ्यावर भात बियाण्याची टोकणी केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचे सगुण भात लागवड तंत्र कोकणातील शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचे मत कालुस्ते विभागाचे कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी व्यक्त केले. एस. आर. तंत्रज्ञानाबाबत कृषी सहाय्यक दादा गरंडे हे केतकी येथे माहिती देत होते. भातलागवड जून महिन्यात पूर्ण करण्याची असून, पीक वाढीच्या कालावधीत पावसाचे प्रमाण कमीजास्त झाले तरी उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त मिळते. चिखलणी व लावणी करावी लागत नसल्यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्के बचत होते. तसेच बियाणे पेरणीनंतर निवडक तणनाशक गोल किंवा अ‍ॅक्झट्रिजीन वापर केल्यास तणाचा प्रादुर्भाव अत्यल्प राहतो. तसेच भात कापणीनंतर त्याची मुळे जमिनीत राहून कुजल्याने सेंद्रीय घटकाचे प्रमाण वाढते व जमिनीचा पोत व प्रत वाढते. ज्या ठिकाणी पाण्याची रब्बी व उन्हाळी हंगामात सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी कडधान्यवर्गीय भाजीपाला पिके घेऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रथम पाच ते दहा गुंठे प्रक्षेत्रावर प्रयोग केल्यास आत्मविश्वास वाढून पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर एस. आर. तंत्रज्ञानाने लागवड होईल, असा विश्वास गरंडे यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस. एस. मिरगावकर, सचिन भागणे, अनंत भागणे, सूर्यकांत गोलमडे, विरेंद्र कांबळे, विठ्ठल भागणे, सुरेश गोलमडे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)खरिपाच्या भातपीक पध्दतीत बदल सुचविण्यावर भर. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी सगुण भात लागवड फायदेशीर. चिखलणी, लावणी करावी लागत नसल्याने उत्पादन खर्चात बचत. भातलागवड जूनमध्ये पूर्ण करावी.