शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

केतकीत एस. आर. तंत्रज्ञान मार्गदर्शन

By admin | Updated: June 17, 2015 00:37 IST

दादा गरंडे : कोकणातील शेतकऱ्यांना भात लागवडीतील तंत्राच्या टीप्स दिल्यास फायदा

चिपळूण : कोकणामध्ये खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भातपीक पद्धतीत बदल सुचवण्यात आहेत. जमिनीची उकल, बेर आणि चिखलणी करून लावणी न लावता गादी वाफ्यावर भात बियाण्याची टोकणी केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचे सगुण भात लागवड तंत्र कोकणातील शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचे मत कालुस्ते विभागाचे कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी व्यक्त केले. एस. आर. तंत्रज्ञानाबाबत कृषी सहाय्यक दादा गरंडे हे केतकी येथे माहिती देत होते. भातलागवड जून महिन्यात पूर्ण करण्याची असून, पीक वाढीच्या कालावधीत पावसाचे प्रमाण कमीजास्त झाले तरी उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त मिळते. चिखलणी व लावणी करावी लागत नसल्यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्के बचत होते. तसेच बियाणे पेरणीनंतर निवडक तणनाशक गोल किंवा अ‍ॅक्झट्रिजीन वापर केल्यास तणाचा प्रादुर्भाव अत्यल्प राहतो. तसेच भात कापणीनंतर त्याची मुळे जमिनीत राहून कुजल्याने सेंद्रीय घटकाचे प्रमाण वाढते व जमिनीचा पोत व प्रत वाढते. ज्या ठिकाणी पाण्याची रब्बी व उन्हाळी हंगामात सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी कडधान्यवर्गीय भाजीपाला पिके घेऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रथम पाच ते दहा गुंठे प्रक्षेत्रावर प्रयोग केल्यास आत्मविश्वास वाढून पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर एस. आर. तंत्रज्ञानाने लागवड होईल, असा विश्वास गरंडे यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस. एस. मिरगावकर, सचिन भागणे, अनंत भागणे, सूर्यकांत गोलमडे, विरेंद्र कांबळे, विठ्ठल भागणे, सुरेश गोलमडे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)खरिपाच्या भातपीक पध्दतीत बदल सुचविण्यावर भर. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी सगुण भात लागवड फायदेशीर. चिखलणी, लावणी करावी लागत नसल्याने उत्पादन खर्चात बचत. भातलागवड जूनमध्ये पूर्ण करावी.