शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

काजुर्लीतील दरडीप्रकरणी कानउघडणी

By admin | Updated: June 30, 2015 00:17 IST

दरड कोसळल्याने धोका : हलगर्जीपणाबद्धल अधिकारी धारेवर

गुहागर : काजुर्ली येथे कुंभारमळा येथे दरड कोसळल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून याप्रकरणी झालेल्या हलगर्जीपणाबाबत तहसीलदारांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.मंगळवार, २३ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काजुर्ली - कुंभारमळा येथे रस्त्याच्या वरील बाजूची दरड कोसळली. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील या रस्त्याला गटार नसल्याने दरड कोसळल्यानंतर पाण्याचा प्रवाह आणि मोठ्या दगडांमुळे समोरचा रस्ता उखडला गेला. त्यामुळे रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. घरांच्या वरच्या बाजूस मोठमोठे दगड अडकून राहिले आहेत. त्यामुळे या पाच घरांना मोठा धोका निर्माण झाला. याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी पंचायत समितीचे उपसभापती सुरेश सावंत, सदस्या गायत्री जाधव यांनी पाहणी केली. शाखा अभियंता दिलीप साळवी यांनी पाण्याचा प्रवाह पूर्ववत होण्यासाठी गटार मोकळे करणे, धोकादायक दगड हटवणे आदी कामे तातडीने करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यासाठी रविवार, २८ रोजी यंत्रसामुग्री पाठवण्याचेही कबूल केले. यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी तयारी दर्शवली. मात्र, रविवार, २८ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत बांधकाम विभागाचे कुणीही अधिकारी अथवा यंत्रसामुग्री घटनास्थळी पोहोचली नाही. यामुळे नाराज ग्रामस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत आबलोली - भातगाव रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती.या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार सुहास थोरात यांच्याशी संपर्क साधून सोमवारी दुपारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि काजुर्ली ग्रामस्थ यांच्यासह पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या उपस्थित बैठक झाली.रविवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही आणि दिलेल्या वेळेत ते घटनास्थळी दुरुस्तीसाठी उपस्थितही राहिले नाहीत. याबाबत तहसीलदार सुहास थोरात यांनी त्यांची कानउघाडणी केली. अभियंता साळवी यांनी फंड नसल्याचे कारण पुढे केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी स्वतंत्र फंड आहे. तुम्ही चुकीची उत्तरे देवू नका, अशी सूचना केली. तत्काळ घटनास्थळी दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री उपलब्ध करुन ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी एम. जी. जाधव, सार्वजनिक बांधकामचे एम. बी. राऊत पी. एस. साळुंखे, ग्रामस्थ डॉ. आनंद जोशी, विजय वेळुंडे, रमेश गोणबरे, रमेश मते, विजय भुवड, सत्यवान वेलुंडे, अनंत मोहिते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)