शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला कल्पवृक्ष हातिस येथे उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्याची आठवण म्हणून रत्नागिरी तालुक्यातील हातिस गावामध्ये एक कल्पवृक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्याची आठवण म्हणून रत्नागिरी तालुक्यातील हातिस गावामध्ये एक कल्पवृक्ष अर्थात नारळाचे झाड लावण्यात आले होते. गेले ७४ वर्षे वादळ, वारे सहन करत हे झाड आजही दिमाखात उभे असून, बदलत्या काळाचा साक्षीदार ठरला आहे. याच कल्पवृक्षाच्या प्रेरणेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावामध्ये नारळाची ७५ झाडे स्वातंत्र्यदिनी लावण्यात येणार आहेत.

देश स्वतंत्र झाल्याची माहिती दळणवळणाची काेणतीही साधने नसलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातिस गावापर्यंतही पोहाेचली होती. आता काही हयात नसलेले आणि आता वयोवृद्ध झालेले त्या काळातील तरुण देश स्वतंत्र झाल्याचे ऐकताच एकत्र आले. सर्वांच्या अंगात उत्साह भरला होता. त्या काळात विजेची सुविधा नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांनी बॅटऱ्या बांबूला बांधल्या. त्याच्या उजेडात ढोल-ताशांच्या गजरात स्वातंत्र्याची मिरवणूक काढली.

देशात स्वातंत्र्यदिन मिठाई वाटून अगर सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. परंतु, हातिसमधील तरुणांच्या मनात काहीतरी वेगळे करण्याची धडपड होती. त्या काळी हातिसच्या किनाऱ्यावर नारळ सुपारीच्या बागा होत्या. येथील शेतकरी नारळ, सुपारीची राेपे आपल्या बागेतच तयार करत असत. स्वातंत्र्याची आठवण म्हणून या कल्पवृक्षाची अर्थात नारळाच्या रोपाची लागवड करण्याची कल्पना तरुणांना सुचली आणि तातडीने ती अमलात आणली.

त्यासाठी नारळाचे उत्तम रोप शोधण्यात आले. गावातील भैरी-जुगाई मंदिराच्या आवारातील जागा निश्चित करण्यात आली आणि ढोल-ताशांच्या गजरात त्या रोपाची मिरवणूक काढण्यात आली. निवडलेल्या जागी स्वातंत्र्यदिनाची आठवण म्हणून या कल्पवृक्षाची लागवड करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे हे प्रतीक आजही दिमाखात उभे आहे.

यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्ताने हातिस ग्रामविकास मंडळातर्फे नारळाची ७५ नारळ झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, केंद्रीय नारळ बोर्डाचे माजी सदस्य राजाभाऊ लिमये, रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती कुमार शेट्ये, डॉ. दिलीप नागवेकर, मरिनर दिलीप भाटकर, सरपंच कांचन नागवेकर तसेच हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. तुषार नागवेकर, उपाध्यक्ष दिवाकर नागवेकर, विजय नागवेकर, जयवंत नागवेकर, राजेंद्र नागवेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------

हा कल्पवृक्ष आता हातीस गावाचा अभिमान ठरले असून, गेली अनेक वर्षे हातिस ग्रामस्थ आणि शाळेतील मुले स्वातंत्र्यदिनी त्याचा पारंपरिक आरती ओवाळून आणि आधुनिक पद्धतीने केक कापून वाढदिवस साजरा करतात. अनेक वेळा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला आहे. सन २०२० स्वातंत्र्यदिनी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्राचे माजी कृषी विद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यांच्याकडून मिळालेली ४० नारळ रोपे लावून साजरा केला होता.