शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कलम आणि बाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब ...

कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब अवगत नसे. आम्ही हायस्कूलला असताना सुरेश तरळ (सुऱ्यादादा) आणि हायस्कूलचा हुशार माजी विद्यार्थी रवी दादा (कै. रवींद्र तरळ गुरुजी) कलमे बांधायला येत. प्रत्येक विद्यार्थ्याने आणलेल्या फांद्या आणि बाटे तपासून घ्यायचे काम ते करत. म्हणतात ना... ‘शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे ते मुलांनी आणलेल्या १५ फांद्या कसोशीने तपासून घेत. मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव स्वतः लक्ष देऊन हे काम पार पाडत. शिपाई नंदूदादा सोबत असे पण त्याचे काम इमानेइतबारे असल्याने कोणा विद्यार्थ्यांचे काहीच चालेना.

फांद्या कोवळ्या असल्या, बारीक असल्या, त्यांना नीट डोळे नसले तर हमखास बाद होत. साधारण काळपट, टोकाला टपोरा डोळा असलेली, साधारण मध्यम जाड आणि तुकतुकीत फांदी सर्वांच्या पसंतीस उतरत असे. सरावाने हे लक्षात येईस्तोवर घरच्या मोजक्या कलमाच्या कोवळ्या फांद्या मोडून वाट लागे.

आंब्याच्या बाटांची पण तीच गत. कोवळ्या आणि खोड जाडसर, लाल असलेल्या बाटा घेऊन जायला लागत असे. बरे वाडीत अनेकजण शाळेत जाणारे त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला बाटा येणार तरी कोठून. पण सरांच्या भीतीपायी त्या जमवाव्या लागत. त्यासाठी विशेषतः उकरड धुंडाळावे लागत. शेणाच्या गायरी शोधाव्या लागत. महेश तेंडुलकर यांची नर्सरी पाहिल्यावर हे सारे सोपे झाले. शाळेला मदत म्हणून शाळेत बांधलेली कलमे बहुधा तेच विकत घेत. त्यांच्या नर्सरीत बाटा रुजवल्या जात. जमीन खणून त्यात आंब्याच्या कोयी टाकून वर गुत (भाताचे मळलेले गवत) घालून मस्त गालीचा तयार केला जाई. हव्या तितक्या बाटा मिळत.

प्रार्थना झाल्यावर कलमे बांधायचे काम सुरु होई. दोन वर्ष पार केल्याने जबाबदार मुले म्हणून बऱ्याचदा दहावीच्या मुलांना हे काम नंदूदादासोबत करावे लागे. साधारण दीड-दोन हजार कलमे बांधली जात असावीत. त्यांना पाने फुटू लागली की, सर्वांनाच श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटे. या काळात किती कलमे जगली? याची सर्वांनाच उत्सुकता असे. लहान मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा लागे. पण ही सारी कामे सरांच्या देखरेखेखाली दरवर्षी नियोजितपणे पार पडत.

शालेय ज्ञान व्यवहाराशी कसे जोडावे, कार्यशिक्षण का महत्त्वाचे आहे? याची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमातून नकळतपणे बरीच मुले कलमे बांधायला शिकली. पावसाळ्यात घराच्या पडवीपडवीत माती, बाटा, कलमाच्या फांद्या दिसू लागल्या. स्वतः कलम टोपून ते रुजले याचा आनंदही मिळत होता. आंब्यांना टोपलेल्या कलमाना जेव्हा आंबे लागतात, तेव्हा टोपणाऱ्याचे नाव निघाल्याशिवाय राहात नाही. बऱ्याच जणांना हे कलमपुराण वाचून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अण्णा नाईक आठवतीलही. पण त्याच्या कलम लावण्याच्या प्रकारापेक्षा कलम टोपणे हाती घेतल्यास भविष्यात गोड फळे चाखण्याची संधी नक्कीच मिळेल हं !

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा