शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कलम आणि बाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब ...

कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब अवगत नसे. आम्ही हायस्कूलला असताना सुरेश तरळ (सुऱ्यादादा) आणि हायस्कूलचा हुशार माजी विद्यार्थी रवी दादा (कै. रवींद्र तरळ गुरुजी) कलमे बांधायला येत. प्रत्येक विद्यार्थ्याने आणलेल्या फांद्या आणि बाटे तपासून घ्यायचे काम ते करत. म्हणतात ना... ‘शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे ते मुलांनी आणलेल्या १५ फांद्या कसोशीने तपासून घेत. मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव स्वतः लक्ष देऊन हे काम पार पाडत. शिपाई नंदूदादा सोबत असे पण त्याचे काम इमानेइतबारे असल्याने कोणा विद्यार्थ्यांचे काहीच चालेना.

फांद्या कोवळ्या असल्या, बारीक असल्या, त्यांना नीट डोळे नसले तर हमखास बाद होत. साधारण काळपट, टोकाला टपोरा डोळा असलेली, साधारण मध्यम जाड आणि तुकतुकीत फांदी सर्वांच्या पसंतीस उतरत असे. सरावाने हे लक्षात येईस्तोवर घरच्या मोजक्या कलमाच्या कोवळ्या फांद्या मोडून वाट लागे.

आंब्याच्या बाटांची पण तीच गत. कोवळ्या आणि खोड जाडसर, लाल असलेल्या बाटा घेऊन जायला लागत असे. बरे वाडीत अनेकजण शाळेत जाणारे त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला बाटा येणार तरी कोठून. पण सरांच्या भीतीपायी त्या जमवाव्या लागत. त्यासाठी विशेषतः उकरड धुंडाळावे लागत. शेणाच्या गायरी शोधाव्या लागत. महेश तेंडुलकर यांची नर्सरी पाहिल्यावर हे सारे सोपे झाले. शाळेला मदत म्हणून शाळेत बांधलेली कलमे बहुधा तेच विकत घेत. त्यांच्या नर्सरीत बाटा रुजवल्या जात. जमीन खणून त्यात आंब्याच्या कोयी टाकून वर गुत (भाताचे मळलेले गवत) घालून मस्त गालीचा तयार केला जाई. हव्या तितक्या बाटा मिळत.

प्रार्थना झाल्यावर कलमे बांधायचे काम सुरु होई. दोन वर्ष पार केल्याने जबाबदार मुले म्हणून बऱ्याचदा दहावीच्या मुलांना हे काम नंदूदादासोबत करावे लागे. साधारण दीड-दोन हजार कलमे बांधली जात असावीत. त्यांना पाने फुटू लागली की, सर्वांनाच श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटे. या काळात किती कलमे जगली? याची सर्वांनाच उत्सुकता असे. लहान मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा लागे. पण ही सारी कामे सरांच्या देखरेखेखाली दरवर्षी नियोजितपणे पार पडत.

शालेय ज्ञान व्यवहाराशी कसे जोडावे, कार्यशिक्षण का महत्त्वाचे आहे? याची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमातून नकळतपणे बरीच मुले कलमे बांधायला शिकली. पावसाळ्यात घराच्या पडवीपडवीत माती, बाटा, कलमाच्या फांद्या दिसू लागल्या. स्वतः कलम टोपून ते रुजले याचा आनंदही मिळत होता. आंब्यांना टोपलेल्या कलमाना जेव्हा आंबे लागतात, तेव्हा टोपणाऱ्याचे नाव निघाल्याशिवाय राहात नाही. बऱ्याच जणांना हे कलमपुराण वाचून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अण्णा नाईक आठवतीलही. पण त्याच्या कलम लावण्याच्या प्रकारापेक्षा कलम टोपणे हाती घेतल्यास भविष्यात गोड फळे चाखण्याची संधी नक्कीच मिळेल हं !

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा