शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

कलम आणि बाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब ...

कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब अवगत नसे. आम्ही हायस्कूलला असताना सुरेश तरळ (सुऱ्यादादा) आणि हायस्कूलचा हुशार माजी विद्यार्थी रवी दादा (कै. रवींद्र तरळ गुरुजी) कलमे बांधायला येत. प्रत्येक विद्यार्थ्याने आणलेल्या फांद्या आणि बाटे तपासून घ्यायचे काम ते करत. म्हणतात ना... ‘शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे ते मुलांनी आणलेल्या १५ फांद्या कसोशीने तपासून घेत. मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव स्वतः लक्ष देऊन हे काम पार पाडत. शिपाई नंदूदादा सोबत असे पण त्याचे काम इमानेइतबारे असल्याने कोणा विद्यार्थ्यांचे काहीच चालेना.

फांद्या कोवळ्या असल्या, बारीक असल्या, त्यांना नीट डोळे नसले तर हमखास बाद होत. साधारण काळपट, टोकाला टपोरा डोळा असलेली, साधारण मध्यम जाड आणि तुकतुकीत फांदी सर्वांच्या पसंतीस उतरत असे. सरावाने हे लक्षात येईस्तोवर घरच्या मोजक्या कलमाच्या कोवळ्या फांद्या मोडून वाट लागे.

आंब्याच्या बाटांची पण तीच गत. कोवळ्या आणि खोड जाडसर, लाल असलेल्या बाटा घेऊन जायला लागत असे. बरे वाडीत अनेकजण शाळेत जाणारे त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला बाटा येणार तरी कोठून. पण सरांच्या भीतीपायी त्या जमवाव्या लागत. त्यासाठी विशेषतः उकरड धुंडाळावे लागत. शेणाच्या गायरी शोधाव्या लागत. महेश तेंडुलकर यांची नर्सरी पाहिल्यावर हे सारे सोपे झाले. शाळेला मदत म्हणून शाळेत बांधलेली कलमे बहुधा तेच विकत घेत. त्यांच्या नर्सरीत बाटा रुजवल्या जात. जमीन खणून त्यात आंब्याच्या कोयी टाकून वर गुत (भाताचे मळलेले गवत) घालून मस्त गालीचा तयार केला जाई. हव्या तितक्या बाटा मिळत.

प्रार्थना झाल्यावर कलमे बांधायचे काम सुरु होई. दोन वर्ष पार केल्याने जबाबदार मुले म्हणून बऱ्याचदा दहावीच्या मुलांना हे काम नंदूदादासोबत करावे लागे. साधारण दीड-दोन हजार कलमे बांधली जात असावीत. त्यांना पाने फुटू लागली की, सर्वांनाच श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटे. या काळात किती कलमे जगली? याची सर्वांनाच उत्सुकता असे. लहान मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा लागे. पण ही सारी कामे सरांच्या देखरेखेखाली दरवर्षी नियोजितपणे पार पडत.

शालेय ज्ञान व्यवहाराशी कसे जोडावे, कार्यशिक्षण का महत्त्वाचे आहे? याची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमातून नकळतपणे बरीच मुले कलमे बांधायला शिकली. पावसाळ्यात घराच्या पडवीपडवीत माती, बाटा, कलमाच्या फांद्या दिसू लागल्या. स्वतः कलम टोपून ते रुजले याचा आनंदही मिळत होता. आंब्यांना टोपलेल्या कलमाना जेव्हा आंबे लागतात, तेव्हा टोपणाऱ्याचे नाव निघाल्याशिवाय राहात नाही. बऱ्याच जणांना हे कलमपुराण वाचून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अण्णा नाईक आठवतीलही. पण त्याच्या कलम लावण्याच्या प्रकारापेक्षा कलम टोपणे हाती घेतल्यास भविष्यात गोड फळे चाखण्याची संधी नक्कीच मिळेल हं !

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा