शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

फक्त उपेक्षेचे धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः! संस्कृत सुभाषिताच्या या ओळी सध्या वर्षांतून दोन वेळा हमखास प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल ...

गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः!

संस्कृत सुभाषिताच्या या ओळी सध्या वर्षांतून दोन वेळा हमखास प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. गुरुजनांबद्दल असणारा आदर बहुतांशी शिष्य या दोन दिवसांत संपवून टाकतात. त्यामुळे वर्षांतील उर्वरित दिवस या शिष्य मंडळींसाठी गुरुजन सामान्य बनतात. गुरुपौर्णिमा व शिक्षक दिनाला आपल्या गुरूवर भरभरून लिहिणाऱ्या या शिष्यांना इतरवेळी गुरुजनांच्या नसलेल्या चुकाही प्रखरतेने जाणवायला लागतात. प्रखरपणे त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या हाडामांसाच्या माणसाला निरंतर गुरूस्थानी का पाहिलं जात नाही, ही विचार करायला लावणारी वस्तुस्थिती आहे. वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आत्मसन्मानाच्या गोष्टी शिकवणारे गुरुजनही कधीकधी त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकवेळा आत्मसन्मान गहाण ठेवताना पाहायला मिळतात. लाचारीमुळे ज्ञानाचा अंत होतो असे म्हणतात. वास्तविकपणे ज्ञानदान करणाऱ्या या गुरुजनांना आपल्या व्यवस्थेनेच लाचार बनविले आहे, असे वाटत नाही का? गुरुजनांना लाचार बनविण्यामध्ये नियम गुंडाळून ठेवत गैरप्रकारांना राजरोस खतपाणी घालणारी शिक्षण विभागातील एक यंत्रणाच जबाबदार आहे.

आश्रम काळामध्ये गुरुजनांना मिळणारा सन्मान आजच्या गुरुजनांना मिळावा इतकी उदात्त अपेक्षा शिक्षकांची निश्चितच नाही. पण, किमान सर्वसामान्य माणसाइतका सन्मान त्यांना मिळालाच पाहिजे. निर्जीव घटकांसोबत काम करणाऱ्यांना आपण ‘साहेब’ उपाधी देतो आणि एखाद्या कुशल कुंभाराप्रमाणे बालमनाला आकार देणाऱ्या गुरुजनांना मात्र... हा निश्चितच देशाचा शैक्षणिक दर्जा ठरविण्यास कारणीभूत ठरणारा एक घटक आहे. खरंतर, या देशाचे राष्ट्रपती पद शिक्षकाने भूषविले आहे. या एका उदाहरणातून या पेशाचे मोठेपण लक्षात येते.

कोरोना काळात शिक्षकांनी त्यांच्या सेवेची व्यापकता अधिक वाढविली आहे. शिक्षकांना काहीच काम नाही, फुकट पगार घेतात म्हणणाऱ्यांना ही एक चपराकच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे शिक्षकांचे पालकत्व आहे, अशी बहुतांशी साहेब मंडळीही याला अपवाद नाहीत. ज्यांच्या कार्य तत्परतेबद्दल ‘दिव्याखाली अंधार’ इतकेच बोलता येईल.

आपले दैनंदिन काम सांभाळून, समस्यांचे भांडवल न करता आपत्तीमध्ये सापडलेल्या देशवासीयांना मदत करण्याची या गुरुजनांची भावना निश्चितच समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. इतर वेळी चार भिंतींमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार बिंबविणारे गुरुजन कोरोना काळात ‘पोलीस मित्र’ बनून रस्त्यावर उभे राहिले. वैद्यकीय क्षेत्राशी कसलाही संबंध नसताना ‘आरोग्यसेवक’ बनले. एखाद्या वैद्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पडेल ते काम केले. या सर्वांचे शिखर म्हणजे वादळ, महापूर यांचे पंचनामे शिक्षकांनी केले आणि प्रशासनाने त्यांना २४ तास धरणावर लक्ष ठेवण्याचे कामही दिले. जेव्हा कोरोनाग्रस्तांपासून रक्तातील नाती पळ काढत होती तेव्हा शिक्षक मात्र आपल्या कर्तव्याचे भान राखत क्वारंटाइन केंद्रांवर त्यांची सेवा करीत होते. किमान या बांधिलकीचे भान तरी समाजाने ठेवावे आणि शिक्षकांची हेटाळणी थांबवावी, अशी अपेक्षा!

- सागर पाटील, टेंभ्ये