शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

जिल्हाभरात भातलागवडीला जोशात सुरूवात

By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST

समाधानकारक पाऊस : लावणीची कामे सुरु, आतापर्यंत ५२८.८२ मिलिमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलाच वेग धरला आहे. आतापर्यंत सरासरी ५२८.८२ मिलिमीटर पाऊस झाला असून, मुसळधार पावसामुळे भात लागवडीलाही सुरूवात झाली आहे. धरपाण्याच्या क्षेत्रावरील भातशेती प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे.खरीप हंगामात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली, १४९६ हेक्टरवर कडधान्य, ६३४.७ हेक्टरवर गळीतधान्य, तर ४७७ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्ये मिळून एकूण ८३ हजार ६६.७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भातबियाण्याची मागणी करण्यात आली होती. कृषी विभागाकडे उपलब्ध ४,०१६ क्विंटल भातबियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने यावर्षी दोन हजार क्विंटल भात बियाणे अधिक मागवण्यात आले होते. खरीप हंगामसाठी १९ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी मिळाली असून, गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे १०० टक्के वाटप करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने खताचे वितरण सुरू आहे. भात पेरणी करून रोपांची लागवड केली जाते. नांगर व पॉवरटिलरच्या सहाय्याने नांगरणी सुरू आहे. पॉवर टिलरचे तासावर भाडे आकारण्यात येत असले तरी कमी वेळेत चांगल्या प्रकारे नांगरणी होते. पाण्याची कमरता भासणाऱ्या शेतात पावसाच्या पाण्यावर प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. पाऊस चांगला बरसत असल्याने लागवडीच्या कामालाही बऱ्यापैकी वेग आला आहे. वाढती मजुरी व नांगर, पॉवरटिलरचे भाडे परवडत नसल्यामुळे गावात गटाव्दारे सामूहिक शेती करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य कामांसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ‘ग्राम बिजोत्पादन’ तयार केले जाणार आहे. ग्राम बिजोत्पादनासाठी जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी करण्यासाठी तालुकानिहाय एक ते दोन गावातून ५० ते ६० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी बांधावरील लागवडीकरिता कृषी विभागातर्फे तुरीचे वितरण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)