शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्हाभरात भातलागवडीला जोशात सुरूवात

By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST

समाधानकारक पाऊस : लावणीची कामे सुरु, आतापर्यंत ५२८.८२ मिलिमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलाच वेग धरला आहे. आतापर्यंत सरासरी ५२८.८२ मिलिमीटर पाऊस झाला असून, मुसळधार पावसामुळे भात लागवडीलाही सुरूवात झाली आहे. धरपाण्याच्या क्षेत्रावरील भातशेती प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे.खरीप हंगामात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली, १४९६ हेक्टरवर कडधान्य, ६३४.७ हेक्टरवर गळीतधान्य, तर ४७७ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्ये मिळून एकूण ८३ हजार ६६.७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भातबियाण्याची मागणी करण्यात आली होती. कृषी विभागाकडे उपलब्ध ४,०१६ क्विंटल भातबियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने यावर्षी दोन हजार क्विंटल भात बियाणे अधिक मागवण्यात आले होते. खरीप हंगामसाठी १९ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी मिळाली असून, गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे १०० टक्के वाटप करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने खताचे वितरण सुरू आहे. भात पेरणी करून रोपांची लागवड केली जाते. नांगर व पॉवरटिलरच्या सहाय्याने नांगरणी सुरू आहे. पॉवर टिलरचे तासावर भाडे आकारण्यात येत असले तरी कमी वेळेत चांगल्या प्रकारे नांगरणी होते. पाण्याची कमरता भासणाऱ्या शेतात पावसाच्या पाण्यावर प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. पाऊस चांगला बरसत असल्याने लागवडीच्या कामालाही बऱ्यापैकी वेग आला आहे. वाढती मजुरी व नांगर, पॉवरटिलरचे भाडे परवडत नसल्यामुळे गावात गटाव्दारे सामूहिक शेती करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य कामांसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ‘ग्राम बिजोत्पादन’ तयार केले जाणार आहे. ग्राम बिजोत्पादनासाठी जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी करण्यासाठी तालुकानिहाय एक ते दोन गावातून ५० ते ६० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी बांधावरील लागवडीकरिता कृषी विभागातर्फे तुरीचे वितरण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)