शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘जिद्द’च्या विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर

By admin | Updated: October 21, 2016 01:02 IST

तीन वर्षे निरंतर शिक्षण : भारतातील पहिले विशेष विद्यार्थी

चिपळूण : विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन गेली २० वर्षे तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ‘जिद्द’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करुन महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिले विशेष विद्यार्थी बनण्याचा सन्मान मिळवला आहे. गेल्या वर्षीही ‘जिद्द’ शाळेने ‘पर्यावरण मित्र विप्रो अर्थियन २०१५ पुरस्कार’ मिळवून हा पुरस्कार मिळविणारी भारतातील पहिली शाळा बनण्याचा सन्मान मिळवला होता. या पुरस्काराचा एक भाग म्हणून विप्रोतर्फे शाळेत तीन वर्षे निरंतर शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार होता. या निरंतर प्रशिक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात दि. १४ ते १६ या कालावधीत बायोकल्चरल कॅम्प घेण्यात आला होता. या कॅम्पचा भंडारदरा-सांदण व्हॅली व कळसूबाई ट्रेक तसेच या भागात राहणाऱ्या ठाकर व महादेव कोळी या आदिवासी लोकांची संस्कृती, राहणीमान याचा अभ्यास करणे, जैवविविधतेचा अभ्यास करणे, गरजांचा अभ्यास करणे हा उद्देश होता. यामध्ये जिद्द शाळेबरोबरच गोवा, पुणे व नगरमधील पुरस्कारप्राप्त शाळांचा समावेश होता. जिद्द शाळेतून अक्षय लिंगायत, तुषार बोराटे, अमोल मोरे व शिक्षक उमेश कुचेकर यांची या कॅम्पसाठी निवड झाली होती. यामध्ये जिद्दच्या विद्यार्थ्यांनी अन्य सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर आदिवासी लोकांची संस्कृती, राहणीमान, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल अशी सांदण दरी, भंडारदरा धरण यांचा अभ्यास यात हिरीरीने भाग घेतला. तसेच समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर हे कोणाच्याही मदतीशिवाय किंंबहुना नॉर्मल विद्यार्थ्यांना मदत करत सर करुन सर्वांचीच मने जिंकली. आदिवासी लोकांबरोबर ठाकर नृत्य करुन स्थानिक पिकांची माहिती घेत या विद्यार्थ्यांनी आपण खरंच विशेष आहोत हे दाखवून दिले. या बायोकल्चरल कॅम्पमधील पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणेच्या प्रोग्रॅम आॅफिसर अ‍ॅनी ग्रेगरी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी) गेल्यावर्षी जिद्द शाळेला मिळाला होता ‘पर्यावरण मित्र विप्रो अर्थियन २०१५’ पुरस्कार. पुरस्कार मिळवणारी भारतातील ‘जिद्द’ ही पहिली शाळा. विप्रोतर्फे जिद्द शाळेत तीन वर्षे निरंतर शिक्षण कार्यक्रम. निरंतर प्रशिक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात बायोकल्चरल कॅम्प. आदिवासी लोकांबरोबर सादर केले ठाकर नृत्य. कळसूबाई शिखर विद्यार्थ्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय केले सर.