शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

२८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष; जंतनाशक गाेळ्या दिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला जंतनाशक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन आरोग्य विभागाकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. दरवर्षी शाळेत मुलांना या गोळ्या वाटप करण्यात येत होते. गतवर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ८ ते १० पर्यंतच्या सुरू असलेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेतच जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

काय आहे जंतदाेष

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. २८ टक्के बालकांच्या आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता असते. त्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्यात येते.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गाेळ्या

ही मोहीम वयाच्या १९ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी दरवर्षी राबविण्यात येते. वर्षातून दोन वेळा या गोळ्या मुलांना देण्यात येतात. एक वर्षाखालील बालकांना जंतनाशकाची गोळी देण्यात येत नाही. १ ते २ वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशकाची अर्धी गोळी देण्यात येते. मुलांना या गोळीची पावडर करूनही दिली जाते.

गाेळ्यांसाठी काेणाकडे संपर्क साधायचा?

शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते. यासोबतच आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्याकडे संपर्क साधल्यास गोळ्या मिळू शकतात. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने या गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

मोहीम यशस्वी करणार

जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकही मूल वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

आराेग्य विभागातर्फे केले जाते वाटप

राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमानुसार दि. २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०२१ अशी जंतनाशक मोहीम राबविणार आहेत.

ज्या मुला-मुलींना २१ सप्टेंबरला जंतनाशक गोळी दिली नसेल त्यांना २८ रोजीच्या मॉप-अप दिनी गोळी द्यावी.