शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

२८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष; जंतनाशक गाेळ्या दिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला जंतनाशक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन आरोग्य विभागाकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. दरवर्षी शाळेत मुलांना या गोळ्या वाटप करण्यात येत होते. गतवर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ८ ते १० पर्यंतच्या सुरू असलेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेतच जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

काय आहे जंतदाेष

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. २८ टक्के बालकांच्या आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता असते. त्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्यात येते.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गाेळ्या

ही मोहीम वयाच्या १९ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी दरवर्षी राबविण्यात येते. वर्षातून दोन वेळा या गोळ्या मुलांना देण्यात येतात. एक वर्षाखालील बालकांना जंतनाशकाची गोळी देण्यात येत नाही. १ ते २ वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशकाची अर्धी गोळी देण्यात येते. मुलांना या गोळीची पावडर करूनही दिली जाते.

गाेळ्यांसाठी काेणाकडे संपर्क साधायचा?

शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते. यासोबतच आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्याकडे संपर्क साधल्यास गोळ्या मिळू शकतात. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने या गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

मोहीम यशस्वी करणार

जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकही मूल वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

आराेग्य विभागातर्फे केले जाते वाटप

राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमानुसार दि. २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०२१ अशी जंतनाशक मोहीम राबविणार आहेत.

ज्या मुला-मुलींना २१ सप्टेंबरला जंतनाशक गोळी दिली नसेल त्यांना २८ रोजीच्या मॉप-अप दिनी गोळी द्यावी.