शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

कोकण हायवे समितीतर्फे ५ सप्टेंबरला जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : गेले अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम द्रुतगतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी ...

रत्नागिरी : गेले अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम द्रुतगतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे दि. ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जनआंदाेलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनकर्ते महामार्गावर काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होणार आहेत.

महामार्ग गणेशोत्सवापूर्वी दि. ३० ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त व्हावा, असा आदेश उच्च न्यायालयाने ॲड. ओवेसी यांच्या याचिकेबाबत सुनावणी दरम्यान दिला होता; मात्र महामार्गाची अवस्था ‘जैसे-थे’ आहे. महामार्गाचे व महामार्गावरील पुलांची कामे द्रुतगतीने करण्यात यावे. महामार्ग खड्डेमुक्त करण्यात यावा. महामार्गावर प्रती तीस किलोमीटर नंतर अद्ययावत प्रसाधनगृह असावे. लोकल बसथांबे महामार्गाचे बाजूला अद्ययावत पद्धतीने उभारण्यात यावेत. महामार्गाच्या दुतर्फा आराखड्यात असल्याप्रमाणे एका किलोमीटरला ५८५ झाडांची लागवड करण्यात यावी, विविध महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे काळे कपडे व काळ्या फिती बांधून महामार्गावर जनआंदोलन करण्यात येणार आहे.

जनआंदोलन महामार्गावरील शिरढोण, पोलादपूर, खेड भरणानाका, चिपळूण बहाद्दूर शेख नाका, संगमेश्वर, हातखंबा, राजापूर-ओणी सिंधुदुर्ग येथील नांदगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त कोकणवासीयांनी सहभागी होऊन महामार्ग सुकर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन समिती प्रमुख संजय यादवराव यांनी केले आहे.