शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोकण हायवे समितीतर्फे ५ सप्टेंबरला जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : गेले अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम द्रुतगतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी ...

रत्नागिरी : गेले अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम द्रुतगतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे दि. ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जनआंदाेलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनकर्ते महामार्गावर काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होणार आहेत.

महामार्ग गणेशोत्सवापूर्वी दि. ३० ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त व्हावा, असा आदेश उच्च न्यायालयाने ॲड. ओवेसी यांच्या याचिकेबाबत सुनावणी दरम्यान दिला होता; मात्र महामार्गाची अवस्था ‘जैसे-थे’ आहे. महामार्गाचे व महामार्गावरील पुलांची कामे द्रुतगतीने करण्यात यावे. महामार्ग खड्डेमुक्त करण्यात यावा. महामार्गावर प्रती तीस किलोमीटर नंतर अद्ययावत प्रसाधनगृह असावे. लोकल बसथांबे महामार्गाचे बाजूला अद्ययावत पद्धतीने उभारण्यात यावेत. महामार्गाच्या दुतर्फा आराखड्यात असल्याप्रमाणे एका किलोमीटरला ५८५ झाडांची लागवड करण्यात यावी, विविध महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे काळे कपडे व काळ्या फिती बांधून महामार्गावर जनआंदोलन करण्यात येणार आहे.

जनआंदोलन महामार्गावरील शिरढोण, पोलादपूर, खेड भरणानाका, चिपळूण बहाद्दूर शेख नाका, संगमेश्वर, हातखंबा, राजापूर-ओणी सिंधुदुर्ग येथील नांदगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त कोकणवासीयांनी सहभागी होऊन महामार्ग सुकर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन समिती प्रमुख संजय यादवराव यांनी केले आहे.