शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

जैतापूर प्रकल्प मंजुरीचे स्वागत : केळुसकर

By admin | Updated: April 16, 2015 00:03 IST

विरोध प्रकल्पाला नव्हे विकासाला

कणकवली : भारताच्या जलद विकासाची घोडदौड रोखण्यासाठी अमेरिकेने भारतामध्ये होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांना खो घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात अरेवा आणि एल अ‍ॅण्ड टी या कंपनीशी करार करून जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामाला चालना दिली आहे. आम्ही या मंजुरीचे स्वागत करतो. भाजपासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे विकासाला विरोध आहे, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मंजुरीच्या अनुषंगाने कोकण विकास आघाडीच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक आघाडीच्या मुंबई- दादर येथील मुख्य कार्यालयात सोमवारी झाली. यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, खजिनदार सुरेश केळुसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब, मुख्य संघटक प्रकाश तावडे, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, भिकाजी जाधव, चंद्रकांत आंबे्र, राजेंद्र केळुसकर आदी उपस्थित होते.केळुसकर यांनी, रायपाटण येथे झालेल्या कोकण विकास आघाडीच्या ३२व्या अधिवेशनामध्ये ठराव मांडून आम्ही जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जैतापूर परिसरातील स्थानिक नेत्यांनी आम्हाला विरोध केला होता. कोणत्याही राष्ट्राचा विजेच्या मुबलक पुरवठ्याअभावी विकास होऊ शकत नाही. अणुऊर्जा हा विजेचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करताना शिवसेनेच्या नेत्यांनी या अणुऊर्जेबाबत आपले अज्ञान प्रकट करताना स्थानिक लोकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण केली होती. त्यामुळे आंदोलन होऊन एका कार्यकर्त्याला स्वत:चा जीव नाहक गमवावा लागला होता, असे म्हणाले.ते म्हणाले, आपल्या देशात १९५२ पासून मुंबईनजीकच्या तुर्भे अणुऊर्जा प्रकल्पासह अलिकडील कारवार येथील प्रकल्प सुरक्षितपणे सुरू आहे. अद्ययावत उच्च बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे कितीही मोठी नैसर्गिक संकटे आली तरी या प्रकल्पाची साधी वीटही हलणार नाही. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आम्ही ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला. शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाचा त्यामुळे विरोध मावळला. मात्र, मताच्या राजकारणासाठी शिवसेनेची नेतेमंडळी नाहक मुद्दा घेऊनच वाटचाल करीत आहे. या प्रकल्पामध्ये एक लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जैतापूर प्रकल्पाबाबत मुंबईत कोकण विकास आघाडीची तातडीची बैठक.मताच्या राजकारणासाठी सेनेचा विरोध : केळुस्कर.