शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जैतापूरप्रश्नी ‘भाजपा’ची संदिग्ध भूमिका शिवसेनेला ठरणार मारक ?

By admin | Updated: May 31, 2014 01:08 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता

रत्नागिरी : स्थानिकांचा जैतापूर प्रकल्पाला विरोध असल्याने शिवसेनेनेही या अणुऊर्जा प्रकल्पाला आपला विरोध असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत भाजपची आतापर्यंतची भूमिका ही ‘तळ्यात मळ्यात’ आहे. केंद्रातील मोदी सरकारकडे प्रकल्पविरोधी भूमिका पटविण्यात शिवसेनेला यश न आल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे १० हजार मेगावॅटच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पात जमिनी गेलेल्यांनी प्रथम मोबदला स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर चांगले पॅकेज दिल्यानंतर अनेक जमीनमालकांनी पैसे स्वीकारले. त्यामुळे या प्रकल्पाला असलेला स्थानिकांचा विरोध मावळला, असे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिकांचा विरोध असल्याचे नेते व कार्यकर्ते सांगत आहेत. मच्छिमारही विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हा मुद्दा हाती घेत प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी लोक मोठ्या संख्येने शिवसेनेबरोबर असल्याचे चित्र आहे. प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या प्रकल्पाचे भवितव्य आता मोदी सरकारच्या हाती आहे. त्यामुळे या राष्टÑीय प्रकल्पाबाबत मोदी सरकारने विरोधाची भूमिका घेतल्यास त्याचे जागतिक संबंधांवर परिणाम होण्याची भीती आहे. विरोधाची भूमिका न घेतल्यास प्रकल्पग्रस्तांचा रोष ओढवून घ्यावा लागणार आहे. परिणामी ‘...सोडले तर पळते’ अशी भाजपाची स्थिती होणार आहे. विजयी मिरवणुकीच्यानिमित्ताने रत्नागिरीत आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना जैतापूर प्रकल्पाला आपला विरोधच असेल, असे स्पष्ट केले आहे. त्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याची चर्चा करून आपला विरोध पटवून देतील, असेही राऊत म्हणाले. मात्र, आजवरची भाजपची भूमिका लक्षात घेता हा प्रकल्प ज्या टप्प्यावर आहे, तेथे रद्द होईल, याची शक्यता नाही. त्यामुळे जैतापूरवासीयांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)