शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरप्रश्नी ‘भाजपा’ची संदिग्ध भूमिका शिवसेनेला ठरणार मारक ?

By admin | Updated: May 31, 2014 01:08 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता

रत्नागिरी : स्थानिकांचा जैतापूर प्रकल्पाला विरोध असल्याने शिवसेनेनेही या अणुऊर्जा प्रकल्पाला आपला विरोध असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत भाजपची आतापर्यंतची भूमिका ही ‘तळ्यात मळ्यात’ आहे. केंद्रातील मोदी सरकारकडे प्रकल्पविरोधी भूमिका पटविण्यात शिवसेनेला यश न आल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे १० हजार मेगावॅटच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पात जमिनी गेलेल्यांनी प्रथम मोबदला स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर चांगले पॅकेज दिल्यानंतर अनेक जमीनमालकांनी पैसे स्वीकारले. त्यामुळे या प्रकल्पाला असलेला स्थानिकांचा विरोध मावळला, असे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिकांचा विरोध असल्याचे नेते व कार्यकर्ते सांगत आहेत. मच्छिमारही विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हा मुद्दा हाती घेत प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी लोक मोठ्या संख्येने शिवसेनेबरोबर असल्याचे चित्र आहे. प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या प्रकल्पाचे भवितव्य आता मोदी सरकारच्या हाती आहे. त्यामुळे या राष्टÑीय प्रकल्पाबाबत मोदी सरकारने विरोधाची भूमिका घेतल्यास त्याचे जागतिक संबंधांवर परिणाम होण्याची भीती आहे. विरोधाची भूमिका न घेतल्यास प्रकल्पग्रस्तांचा रोष ओढवून घ्यावा लागणार आहे. परिणामी ‘...सोडले तर पळते’ अशी भाजपाची स्थिती होणार आहे. विजयी मिरवणुकीच्यानिमित्ताने रत्नागिरीत आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना जैतापूर प्रकल्पाला आपला विरोधच असेल, असे स्पष्ट केले आहे. त्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याची चर्चा करून आपला विरोध पटवून देतील, असेही राऊत म्हणाले. मात्र, आजवरची भाजपची भूमिका लक्षात घेता हा प्रकल्प ज्या टप्प्यावर आहे, तेथे रद्द होईल, याची शक्यता नाही. त्यामुळे जैतापूरवासीयांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)