शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जयगड योजनेचे पाणी महागणार

By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST

धरणाची उंची वाढणार : पाणीपट्टीत सहापट वाढ

रत्नागिरी : जयगड नळपाणी योजनेंतर्गत कळझोंडी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे पाणीपट्टी वार्षिक ३६० वरुन २४०० रुपयापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या भागातील ग्राहकांना सहापटीने वाढणाऱ्या पाणीपट्टीचा सामना करावा लागणार आहे.वाटद जिल्हा परिषद गटामध्ये कार्यान्वित असलेली जयगड प्रादेशिक नळपाणी योजना परिसर अभियांत्रिकी विभागाकडून सन १९८० ते १९८५ या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली. या योजनेत १३ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २६ महसुली गावे व १८५ वाड्या अंतर्भूत आहेत. ही योजना १९९० पासून पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ताब्यात घेतली आहे. सन २००६ सालच्या प्रस्तावित २९२५०० लोकसंख्येसाठी ४० लीटर प्रतिमाणसी प्रतिदिन याप्रमाणे १.१७ एमएलडीशिवाय जयगड परिसरातील पर्यटनासाठी ०.१६ एमएलडी असे एकूण १.३३ एमएलडी पाणी पुरवठा करत आहे. परंतु प्रत्यक्षात १.७० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो.या योजनेतून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केल्यास राखीव असलेल्या साठ्यातील पाणी पर्यटनासाठी देण्याचे व बाजूला टंचाईग्रस्त असलेल्या गडनरळ गावाला देण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला होता. लोडशेडिंग, पंपाची क्षमता, साठवण टाकीची क्षमता, नादुरुस्त पाईपलाईन, अपुरा कर्मचारीवर्ग या तांत्रिक बाबींचा विचार करता ओमकार प्रॉपर्टी, मालगुंड येथे दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. मात्र, गडनरळ गावासाठी कळझोंडी गावाच्या टाकीपर्यंत पाणीपुरवठा सुरु आहे. १९८५ साली पूर्ण झालेल्या या कळझोंडी धरणाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. वाहून जाणारे पाणी दुसरा पंप लावून पुन्हा धरणात टाकावे लागत आहे. या धरणाची उंची वाढवण्याचा विचार आहे. परंतु ज्या धरणाचा पायाच मजबूत नाही, त्याची उंची वाढवणे धोक्याचे आहे. या धरणाच्या खाली वरवडे गाव आहे. उंची वाढवून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न झाल्यास माळीणसारखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. धरणाची उंची न वाढवता दुरुस्त करुन गाळ काढल्यास कितीतरी पटीने पाणीसाठा वाढू शकतो. सुकाणू समिती स्थापनेसाठी पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जीवन प्रादेशिकने परिसरातील सरपंचांची बैठक घेतल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत धरणाची उंची, साठवण टाकी आदी दुरुस्ती करुन दिल्यानंतर २४०० रुपये प्रतिवर्षी पाणीपट्टी भरण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)