शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जयगड योजनेचे पाणी महागणार

By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST

धरणाची उंची वाढणार : पाणीपट्टीत सहापट वाढ

रत्नागिरी : जयगड नळपाणी योजनेंतर्गत कळझोंडी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे पाणीपट्टी वार्षिक ३६० वरुन २४०० रुपयापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या भागातील ग्राहकांना सहापटीने वाढणाऱ्या पाणीपट्टीचा सामना करावा लागणार आहे.वाटद जिल्हा परिषद गटामध्ये कार्यान्वित असलेली जयगड प्रादेशिक नळपाणी योजना परिसर अभियांत्रिकी विभागाकडून सन १९८० ते १९८५ या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली. या योजनेत १३ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २६ महसुली गावे व १८५ वाड्या अंतर्भूत आहेत. ही योजना १९९० पासून पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ताब्यात घेतली आहे. सन २००६ सालच्या प्रस्तावित २९२५०० लोकसंख्येसाठी ४० लीटर प्रतिमाणसी प्रतिदिन याप्रमाणे १.१७ एमएलडीशिवाय जयगड परिसरातील पर्यटनासाठी ०.१६ एमएलडी असे एकूण १.३३ एमएलडी पाणी पुरवठा करत आहे. परंतु प्रत्यक्षात १.७० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो.या योजनेतून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केल्यास राखीव असलेल्या साठ्यातील पाणी पर्यटनासाठी देण्याचे व बाजूला टंचाईग्रस्त असलेल्या गडनरळ गावाला देण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला होता. लोडशेडिंग, पंपाची क्षमता, साठवण टाकीची क्षमता, नादुरुस्त पाईपलाईन, अपुरा कर्मचारीवर्ग या तांत्रिक बाबींचा विचार करता ओमकार प्रॉपर्टी, मालगुंड येथे दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. मात्र, गडनरळ गावासाठी कळझोंडी गावाच्या टाकीपर्यंत पाणीपुरवठा सुरु आहे. १९८५ साली पूर्ण झालेल्या या कळझोंडी धरणाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. वाहून जाणारे पाणी दुसरा पंप लावून पुन्हा धरणात टाकावे लागत आहे. या धरणाची उंची वाढवण्याचा विचार आहे. परंतु ज्या धरणाचा पायाच मजबूत नाही, त्याची उंची वाढवणे धोक्याचे आहे. या धरणाच्या खाली वरवडे गाव आहे. उंची वाढवून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न झाल्यास माळीणसारखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. धरणाची उंची न वाढवता दुरुस्त करुन गाळ काढल्यास कितीतरी पटीने पाणीसाठा वाढू शकतो. सुकाणू समिती स्थापनेसाठी पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जीवन प्रादेशिकने परिसरातील सरपंचांची बैठक घेतल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत धरणाची उंची, साठवण टाकी आदी दुरुस्ती करुन दिल्यानंतर २४०० रुपये प्रतिवर्षी पाणीपट्टी भरण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)