शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जाधव-कदम गट निकमांसाठी एकत्र तरीही...

By admin | Updated: October 21, 2014 23:44 IST

कटुता अगर पक्षविरोधी काम केल्याची चर्चा नव्हती किंवा तसे आढळले नाही. तरीही निकम यांचा पराभव टळला नाही.

चिपळूण : कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना निवडून आणायचेच असा चंग बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकमेकांचे पारंपरिक विरोधक आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांचे गट एकत्र काम करीत होते. तरीही पक्षाला अपयश आले. याचे शल्य अनेकांच्या उरी राहिले आहे.राजकारणाच्या पलिकडे समाजकारण जपणाऱ्या शेखर निकम यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेसाठी संधी दिली. कोणत्याही परिस्थितीत निकम निवडून आले पाहिजेत, असे आदेश नेत्यांना देण्यात आले होते. २००९ च्या निवडणुकीतील १८ हजाराचे शिवसेना युतीचे मताधिक्य व लोकसभेचे मोदी लाटेतील ३१ हजाराचे मताधिक्य कमी करुन प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करायची होती. हे काम अवघड होते. पण अशक्य नव्हते. शिवसैनिकांमध्ये जी रग असते, जी इर्षा असते ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षनिष्ठेने काम करण्यापेक्षा उमेदवार कोण, आपल्याला कोणी बोलवले नाही, आपल्याला कोण विचारत नाही अशा अनेक नकार घंटा वाजवत असतात.या निवडणुकीत मात्र निकम यांच्यासाठी कदम व जाधव या दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यरत होते. कोठेही कटुता अगर पक्षविरोधी काम केल्याची चर्चा नव्हती किंवा तसे आढळले नाही. तरीही निकम यांचा पराभव टळला नाही. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व गट-तट एकत्र होते. शिवाय सक्षम उमेदवार पक्षाने दिला होता. उमेदवार म्हणून जे जे काही करायचे ते निकम यांनी केले होते. कोणत्याही आघाडीवर निकम स्वत: कमी पडले नव्हते. प्रचारासाठीही त्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबविली. परंतु, आम्ही असताना तुमची माणस कशाला असे सांगून काही पदाधिकाऱ्यांनी निकम यांना निश्चिंत केले. पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अन्य भागाकडे वळविले. हा विश्वासच निकम यांना काही प्रमाणात त्रासदायक ठरला. अशी जबाबदारी घेणारे नेते व कार्यकर्ते काँग्रेसी स्टाईलने काम करीत राहिले. त्यांनी काम केले परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सक्षम उमेदवार व संपूर्ण यंत्रणा हातात असताना कार्यकर्त्यांनी चौफेर काम करायला हवे होते. तरच राष्ट्रवादीला पुन्हा विजय मिळविता आला असता. कारण प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण हेही तोडीसतोड व निष्कलंक चारित्र्याचे होते. त्यांच्यावर कोणताही आरोप किंवा डाग नव्हता याचे भान कार्यकर्त्यांनी राखणे गरजेचे होते. राष्ट्रवादीला चिपळूणमध्ये जे मताधिक्य मिळाले त्यात वैयक्तिक योगदान मोठे होते. या मतदारसंघात निवडणूक लढविताना पूर्वीचे मताधिक्य कमी करणे शक्य नाही. परंतु, निकम यांनी आपली कोरी पाटी व आतापर्यंतच्या कामाच्या पुण्याईवर चुरशीची लढत दिली. (प्रतिनिधी)