शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

तरुणाईला आयटीची साद...

By admin | Updated: August 26, 2014 21:49 IST

ग्रामीण भाग सरसावला : पारंपरिक शिक्षणाला फाटा

खाडीपट्टा : खाडीपट्टासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता बुद्धी आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर पारंपरिक शिक्षणाला फाटा देत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले नशीब आजमावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असणाऱ्या आयटी क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड, कला शाखेची पदवी, बीएड, सैन्यदल, कृषी डिप्लोमा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पारंपरिक क्षेत्र होती. आता या क्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा असून, नोकरीसाठी वणवण करावी लागले. त्यासाठी पैसा आणि वशिल्याची गरज असल्याच्या बाबी उघडपणे बोलल्या जात आहेत. शिवाय अलिकडच्या काळात या क्षेत्रातील कॉलेजची संख्या आणि विद्यार्थी संख्याही वाढल्याने नोकरीची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या दहा-बारा वर्षात देश-विदेशातील इन्फोसिस, आयजीएम, इन्फोटेक, कोहिनूर, टीसीएस, विप्रो, सत्यम, आयप्लेक्स यांसारख्या अनेक नामांकित आयटी कंपन्या आपल्या देशात छोट्या-मोठ्या शहरातून आपला विस्तार झपाट्याने करत आहेत. याबाबतीत कोकण दुर्लक्षित असले तरी आता चिपळूण, दापोलीसह पुणे, ठाणे, मुंबईसारख्या शहरात या कंपन्यांनी जाळे विणल्याचे दिसून येत आहे. २० हजारांपासून लाखो रुपये पगार मिळवण्याची संधी या क्षेत्रात तरुणांना मिळत आहे. या क्षेत्रात गुणवत्तेवर निवड होत असल्याने खाडीपट्टासारख्या ग्रामीण तरुणाईलाही हे क्षेत्र साद घालताना दिसत आहे. कॉम्प्युटर डिप्लोमा, बीई, बी. टेक, एमटेक, आयटी अशा शिक्षणासाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण शहराकडे वळत आहेत. (वार्ताहर)