शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

तरुणाईला आयटीची साद...

By admin | Updated: August 26, 2014 21:49 IST

ग्रामीण भाग सरसावला : पारंपरिक शिक्षणाला फाटा

खाडीपट्टा : खाडीपट्टासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता बुद्धी आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर पारंपरिक शिक्षणाला फाटा देत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले नशीब आजमावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असणाऱ्या आयटी क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड, कला शाखेची पदवी, बीएड, सैन्यदल, कृषी डिप्लोमा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पारंपरिक क्षेत्र होती. आता या क्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा असून, नोकरीसाठी वणवण करावी लागले. त्यासाठी पैसा आणि वशिल्याची गरज असल्याच्या बाबी उघडपणे बोलल्या जात आहेत. शिवाय अलिकडच्या काळात या क्षेत्रातील कॉलेजची संख्या आणि विद्यार्थी संख्याही वाढल्याने नोकरीची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या दहा-बारा वर्षात देश-विदेशातील इन्फोसिस, आयजीएम, इन्फोटेक, कोहिनूर, टीसीएस, विप्रो, सत्यम, आयप्लेक्स यांसारख्या अनेक नामांकित आयटी कंपन्या आपल्या देशात छोट्या-मोठ्या शहरातून आपला विस्तार झपाट्याने करत आहेत. याबाबतीत कोकण दुर्लक्षित असले तरी आता चिपळूण, दापोलीसह पुणे, ठाणे, मुंबईसारख्या शहरात या कंपन्यांनी जाळे विणल्याचे दिसून येत आहे. २० हजारांपासून लाखो रुपये पगार मिळवण्याची संधी या क्षेत्रात तरुणांना मिळत आहे. या क्षेत्रात गुणवत्तेवर निवड होत असल्याने खाडीपट्टासारख्या ग्रामीण तरुणाईलाही हे क्षेत्र साद घालताना दिसत आहे. कॉम्प्युटर डिप्लोमा, बीई, बी. टेक, एमटेक, आयटी अशा शिक्षणासाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण शहराकडे वळत आहेत. (वार्ताहर)