शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती दिल्यास सतर्कता बाळगणे शक्य होईल : अमोघ शुक्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

रत्नागिरी : समुद्रातील अविरत वावरामुळे मच्छीमार समुदायाची समुद्रातील प्रत्येक बारीक घटनांवर नजर असते. मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ...

रत्नागिरी : समुद्रातील अविरत वावरामुळे मच्छीमार समुदायाची समुद्रातील प्रत्येक बारीक घटनांवर नजर असते. मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती योग्यवेळी दिल्यास समुद्रात जीविताचे रक्षण करणे आणि राष्ट्रविघातक घटकांचे गुपित उद्दिष्ट साध्य करण्यापासून रोखणे, आदी उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच सतर्कता बाळगता येईल, असे प्रतिपादन तटरक्षक दलाचे सहाय्यक समादेशक अमोघ शुक्ला यांनी केले.

यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला पंच्यात्तर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने तटरक्षक दल ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहे. या अनुषंगाने गुरूवारी दुपारी रत्नागिरीनजीकच्या भाट्ये गावात विशेष समुदाय संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. भारतीय तटरक्षक अवस्थानने यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार केली असून, त्यात निबंध स्पर्धा, समुदाय संवाद कार्यक्रम, वृक्ष लागवड कार्यक्रम आदींचा समावेश आहे. यावेळी अग्निशमन उपाययोजनेचे प्रात्यक्षिकदेखील करण्यात आले.

तटरक्षक दलातर्फे आयोजित या विशेष समुदाय संवाद कार्यक्रमाद्वारे बोटीमध्ये अग्निशमन उपाययोजना, डीएटी उपकरणाचे महत्त्व व प्रात्यक्षिक, जीवनरक्षक उपकरणांचे महत्त्व व प्रात्यक्षिक, सामूहिक मच्छिमारीचे महत्त्व, सागरी संचार उपकरणांचे महत्त्व व प्रात्यक्षिक, संकट काळात अडकलेल्या मच्छिमारांना मदत पुरविण्यासंदर्भात तटरक्षक दलाचे कार्य व टोल फ्री संपर्क क्रमांक, स्वच्छ सागर अभियानाबाबत मार्गदर्शन, सागरातील सुरक्षेसंबंधी जागरूकता, बायोमेट्रिक ओळखपत्र बाळगणे आदीबद्दल मच्छिमारांना माहिती देण्यात आली. यावेळी अग्निशमन उपाययोजनेचे प्रात्यक्षिकदेखील करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाट्ये मच्छीमार सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अरमान उस्मान भाटकर, सदस्य अब्दुल लतीफ भाटकर, आसिफ भाटकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष इब्राहीम वाडकर व इतर २५ मच्छीमार उपस्थित होते. रिलायन्स फाऊंडेशनचे राजेश कांबळे, सागरी पोलीस दलाचे उपनिरीक्षक आर. आर. दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमावेळी कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांची खबरदारी घेतली होती.