शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तिढा सुटला; बाजारपेठांचे भवितव्य टांगणीलाच...!

By admin | Updated: September 11, 2016 23:31 IST

मुंबई-गोवा महामार्ग : बाधित होणाऱ्या संबंधितांना दिलासा

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूसंपादनावरून काही शहरांमध्ये निर्माण झालेला तिढा उड्डाणपूल व ४५ मीटर रस्ता रुंदीच्या प्रस्तावामुळे सुटला आहे. खासदार विनायक राऊत यांनी तसे सांगितल्याने या प्रक्रियेत बाधित होणाऱ्या संबंधितांना दिलासा मिळाला आहे. परंतु उड्डाणपुलांमुळे महामार्गावरील वाहनांचा शहर बाजारपेठांशी असलेला संपर्क संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या बाजारपेठांचे भवितव्य टांगणीला लागल्याची चर्चा सुरू आहे. तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉँक्रीटीकरणातून हे चौपदरीकरण होणार आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प होत आहे. सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या या चौपदरीकरण प्रकल्पाला रुंदीकरणासाठी अधिकची जागा लागणार आहे. त्याबाबतचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांच्या अनेक तक्रारी, आक्षेप पुढे आले. परिणामी चौपदरीकरण रखडणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. जमीनमालकांच्या तक्रारींपेक्षाही महामार्गावर असलेल्या शहरांतील मुख्य बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांची रुंदी वाढवण्यास विरोध सुरू झाला. मुख्यत्वे चिपळूण, पाली, लांजा व राजापूर येथे हा विरोध दिसून आला. चिपळूण, पाली व लांजा बाजारपेठ चौपदरीकरणात संपुष्टात येईल, अशी भूमिका व्यापारी व नागरिकांनी घेतली. त्यातून मार्ग काढण्यासाठी नंतर प्रयत्न सुरू झाले. चिपळूणचा विषय सर्वांत प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. त्यामुळे हा मोठा अडथळा दूर करण्यासाठी तेथे उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सर्वेक्षणाअंती हाच उपाय सुचविण्यात आला. आता चिपळुणात उड्डाणपूल होणार हे निश्चित झाले आहे. पाली येथून दोन महामार्ग जाणार आहेत. मुंबई-गोवा तसेच रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग पालीतून जाणार असल्याने तेथील बाजारपेठेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यासाठीही विरोध दर्शविण्यात आला. बायपास रोडचा प्रस्ताव पुढे आला. परंतु त्यामुळे बाजारपेठेचे अस्तित्त्वच संपून जाईल, असे चित्र निर्माण झाले. बाजारपेठेतूनच चौपदरीकरण करावे, परंतु कमी जागा वापरावी, असा मुद्दा पुढे आला. मात्र, आता पाली बाजारातून उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु वाहने उड्डाणपुलावरून जाणार असल्याने त्यामुळेही पाली बाजारपेठेचे महत्व कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेतून मुंबई-गोवा महामार्ग जात असल्याने चौपदरीकरणात या बाजारपेठेचे मोठे नुकसान होणार होते. रुंदीकरणाच्या अटीनुसार चौपदरीकरण झाले, तर संपूर्ण बाजारपेठेवरच स्थलांतराचे संकट येणार होते. त्यामुळे लांजा बाजारपेठेतून चौपदरीकरण करताना रुंदीकरणासाठीच्या जागेची अट शिथिल करावी, अशी मागणी सुरुवातीला केली जात होती. मात्र, त्यामुळे तिढा सुटत नव्हता. अखेर लांजा बाजारपेठेतून उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजापूरचा विषय मात्र प्रलंबित आहे. सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेतूनही उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला आहे. वागदे व कुडाळ येथे चौपदरीकरणासाठी रस्त्याची रुंदी ६०ऐवजी ४५ मीटर्स ठेवण्याचा निर्णय झाल्याने तेथील समस्याही संपली आहे. भूसंपादनासाठी जमीन मालकांना मिळणाऱ्या भरपाई रकमेची घोषणाही लवकरच होणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे. चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी उड्डाणपुलांचा पर्याय स्वीकारणाऱ्या त्या त्या ठिकाणच्या बाजारपेठांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.