शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

समाजबांधवांनी संघटित होणे काळाची गरज - संजय निवळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रोहिदास व रविदास समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे. काही विकासात्मक गोष्टींपासून हा समाज वंचित ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रोहिदास व रविदास समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे. काही विकासात्मक गोष्टींपासून हा समाज वंचित राहिला आहे. काही ठिकाणी समाजातील भगिनींना विकृतांच्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी कायम कटिबद्ध असल्याचे भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांशी बाेलताना त्यांनी सांगितले की, आपल्या समाजातील विविध व्यक्ती समाजपयोगी कार्य करून नावारूपाला आलेल्या आहेत; परंतु आताच्या परिस्थितीत समाजाचा विकास होताना दिसत नाही. सरकारच्या योजना असोत किंवा इतर काही गोष्टींची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील गरीब कुटुंब, तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मिळत नाही. आपल्या समाजातील खूप लोक मोठमोठ्या शासकीय अधिकारी तसेच राजकीय पदावर विराजमान आहेत; पण समाजाच्या कल्याणासाठी पुढाकार घेण्याची त्यांची मानसिकता होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही मानसिकता बदलून समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे निवळकर म्हणाले.

काही लोक रोहिदास आणि रविदास असा भेदभाव करून समाजामध्ये भांडण लावून दुफळी निर्माण करत आहेत. हा वाद मिटवून सर्वांनी एकजुटीने समाजाच्या न्यायहक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. हे एकत्रीकरण घडवण्यासाठी व चर्चेकरिता भारतीय चर्मकार समाज संघटनेचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संजय निवळकर यांनी दिली.