शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महामारीमध्ये गैरसमज पसरविणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास टाकला होता. कोरोनामुळे अनेकांचे ...

कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास टाकला होता. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंबच्या कुटुंब, संसार उद्ध्वस्त झाले. कोणाच्या घरातून कमावता आधार गेला तर कोणाचे आई-वडील, कोणाचा मुलगा, तर कोणाचा भाऊ, तर कोणाची अर्धांगिनी गेली. त्यामुळे कोरोनाने अनेकांचे जीवनच उद्ध्वस्त झाले. संसार उघड्यावर आल्याने काही नशिबाला दोष देत आहेत, तर काहीजण हा निसर्गाचा प्रकोप असल्याचे सांगून आपल्या जीवनाची गाडी पुढे ढकलत आहेत. त्यामुळे वर्षभर बहुतांश लोक कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. काहीजण या कोरोना महामारीचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:चे खिसे कसे भरणार, या विचारात मग्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने अनेकांना मारलं, तर काहींना तारलं, असेच म्हटले जात आहे. अर्थात यात उद्ध्वस्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ज्याच्या-त्याच्या तोंडी कोरोना हा एकमेव शब्द असला तरी त्यामध्ये दहशत, भीती असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलेही मोठ्यांचे ऐकून आपल्या पाल्यांना, घरातील माेठ्यांना, ‘कोरोना बाहेर आहे, जाऊ नका’, असे सांगताना दिसतात. त्यांना कोरोना काय हे माहीतही नसेल. मात्र, ज्यांना कोरोना काय आहे, हे समजूनही आजची परिस्थिती रस्त्यावर पाहावयास मिळत आहे, कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवले असताना, अनेकजण अतिशहाण्यासारखे वागताना दिसतात. कारण नसतानाही रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याचा त्रास प्रशासनाला होतो, हे निश्चित आहे. कारण पोलीस भर उन्हात दिवसभर लोकांच्या संरक्षणासाठी राबताना त्यांना दिसत नसतील, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काय म्हणायचं. गुराढोरांसारखं वागत असतील, तर ही कसली माणसं, असेच म्हणावे लागेल. या महामारीमध्ये लोक मरताहेत, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर १२-१२ तास, तर वेळ पडल्यास २४ तास काम करून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना साथ देण्याऐवजी बिनधास्तपणे कसलीही तमा न बाळगता काहींनी विनाकारण आपले फिरती सत्र पुढेच सुरू ठेवल्याचे दिसून येते.

कोरोना महामारीमध्ये वर्षभरात अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक तसेच इतर कर्मचारी आणि लोकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या करताना फायदा कमीच, पण न भरून येणारे नुकसान होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये हातावर पोट असणाऱ्यांचे तर मोठे हाल होत आहेत.

सध्या तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या पाहता कर्मचारी, डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. ही संख्या भरून काढण्यासाठी शासनाकडून जाहिरातबाजी करून ती भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यासाठी पुढे येण्याचे प्रमाणही कमी असल्याने अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच साेशल मीडियावरून कोरोनाबाबत समज-गैरसमज पसरविले जात आहेत. गैरसमज पसरविणाऱ्यांना रोखण्यासाठी आता लोकांनीच पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वागल्यास गैरसमज पसरणार नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीवर विजय मिळवता येईल.