शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

महामारीमध्ये गैरसमज पसरविणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास टाकला होता. कोरोनामुळे अनेकांचे ...

कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास टाकला होता. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंबच्या कुटुंब, संसार उद्ध्वस्त झाले. कोणाच्या घरातून कमावता आधार गेला तर कोणाचे आई-वडील, कोणाचा मुलगा, तर कोणाचा भाऊ, तर कोणाची अर्धांगिनी गेली. त्यामुळे कोरोनाने अनेकांचे जीवनच उद्ध्वस्त झाले. संसार उघड्यावर आल्याने काही नशिबाला दोष देत आहेत, तर काहीजण हा निसर्गाचा प्रकोप असल्याचे सांगून आपल्या जीवनाची गाडी पुढे ढकलत आहेत. त्यामुळे वर्षभर बहुतांश लोक कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. काहीजण या कोरोना महामारीचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:चे खिसे कसे भरणार, या विचारात मग्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने अनेकांना मारलं, तर काहींना तारलं, असेच म्हटले जात आहे. अर्थात यात उद्ध्वस्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ज्याच्या-त्याच्या तोंडी कोरोना हा एकमेव शब्द असला तरी त्यामध्ये दहशत, भीती असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलेही मोठ्यांचे ऐकून आपल्या पाल्यांना, घरातील माेठ्यांना, ‘कोरोना बाहेर आहे, जाऊ नका’, असे सांगताना दिसतात. त्यांना कोरोना काय हे माहीतही नसेल. मात्र, ज्यांना कोरोना काय आहे, हे समजूनही आजची परिस्थिती रस्त्यावर पाहावयास मिळत आहे, कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवले असताना, अनेकजण अतिशहाण्यासारखे वागताना दिसतात. कारण नसतानाही रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याचा त्रास प्रशासनाला होतो, हे निश्चित आहे. कारण पोलीस भर उन्हात दिवसभर लोकांच्या संरक्षणासाठी राबताना त्यांना दिसत नसतील, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काय म्हणायचं. गुराढोरांसारखं वागत असतील, तर ही कसली माणसं, असेच म्हणावे लागेल. या महामारीमध्ये लोक मरताहेत, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर १२-१२ तास, तर वेळ पडल्यास २४ तास काम करून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना साथ देण्याऐवजी बिनधास्तपणे कसलीही तमा न बाळगता काहींनी विनाकारण आपले फिरती सत्र पुढेच सुरू ठेवल्याचे दिसून येते.

कोरोना महामारीमध्ये वर्षभरात अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक तसेच इतर कर्मचारी आणि लोकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या करताना फायदा कमीच, पण न भरून येणारे नुकसान होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये हातावर पोट असणाऱ्यांचे तर मोठे हाल होत आहेत.

सध्या तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या पाहता कर्मचारी, डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. ही संख्या भरून काढण्यासाठी शासनाकडून जाहिरातबाजी करून ती भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यासाठी पुढे येण्याचे प्रमाणही कमी असल्याने अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच साेशल मीडियावरून कोरोनाबाबत समज-गैरसमज पसरविले जात आहेत. गैरसमज पसरविणाऱ्यांना रोखण्यासाठी आता लोकांनीच पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वागल्यास गैरसमज पसरणार नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीवर विजय मिळवता येईल.