शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

नांदिवडेतील ‘विलगीकरण कक्ष’ ठरला रुग्णांसाठी नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडेतील सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून विलगीकरण कक्ष उभारला आहे. लोकांसाठी लोकसहभागातून सुरू केलेला हा विलगीकरण कक्ष अनेक गोरगरीब रुग्णांसाठी फायद्याचा ठरत आहे. या कक्षातून आतापर्यंत ७२ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.

रत्नागिरी तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. रुग्णालये फुल्ल झाल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी नांदिवडे गावात १२ मे राेजी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. जयगड पंचक्रोशीत कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक होत चालली असताना स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत विलगीकरण कक्ष सुरू केला. गरीब ग्रामीण जनतेला शहरात येऊन उपचार खर्च परवडणारा नसल्याने उपसरपंच विवेक सुर्वे यांनी जयगड हायस्कूलमध्ये कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य केंद्र, खंडाळाचे सर्व कर्मचारी आणि डॉ. श्रुती कदम, डॉ. आशय जोशी, डॉ. जोग यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले. विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आपुलकीची सेवा मिळत आहे. नांदिवडे, कचरे, संदखोल, कासारी, सांडेलावगण, जयगड येथील रुग्णांना या केंद्राचा फायदा होत आहे. या विलगीकरण कक्षामुळे जयगड पंचक्रोशीतील साथ आटोक्यात येण्यास मदत होत आहे.

विलगीकरण कक्षामध्ये दाखल प्रत्येक रुग्णासाठी उपसरपंच विवेक सुर्वे यांच्या घरामधून रोजचे दोनवेळेचे जेवण दिले जाते तसेच सरपंच आर्या गडदे यांच्याकडून दोनवेळचा नाष्टा दिला जातो. विशेष म्हणजे ग्राम कृती दलामधील प्रसाद गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष संकेत मेने, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र आडाव, ग्रामपंचायत कर्मचारी संगीता बंडबे, आशा सेविका हे विलगीकरण कक्षामध्ये दाखल हाेणाऱ्या प्रत्येकी रुग्णाची काळजी घेतात. या उपक्रमाला भगवान शिरधनकर आणि चंद्रहास आडाव या दोन पोलीसपाटलांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

-------------------------

जिंदल कंपनीकडून २४ तास रुग्णवाहिका सेवा

या विलगीकरण कक्षामध्ये रूग्णांना दाखल करण्यासाठी जिंदल कंपनीने २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. विलगीकरण कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ही मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दोन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर दिले आहेत.