शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर हागणदारीमुक्त घोषित

By admin | Updated: March 22, 2016 00:56 IST

नगरपालिका विशेष सभेत निर्णय : शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मंजूर

इस्लामपूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत इस्लामपूर शहर सोमवारी ‘हागणदारीमुक्त शहर’ म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त शहराचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. सभेत विकास कामाच्या निधी वाटपावरुन माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. पालिका सभागृहात सोमवारी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली. सभेत मुख्याधिकारी झिंजाड यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्याच्या उद्घोषणेची माहिती दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत २0११ च्या जनगणनेनुसार ६८0 शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी ७८ लाखांचा निधी मिळाला आहे. शासनाचे १२ हजार रुपये व पालिकेतर्फे १४ व्या वित्त आयोगातून २ हजार ५00 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.ते म्हणाले की, शहरात सध्या ४२९ सार्वजनिक शौचालये आहेत. आणखी ४0 शौचालयांचे काम चालू आहे. शासनाने आतापर्यंत दोन टप्प्यात ७0 शहरांना हागणदारीमुक्त शहर म्हणून घोषित केले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात इस्लामपूरचासमावेश होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासन समितीच्या पाहणीनंतर हागणदारीमुक्त शहराला १ कोटी ५0 लाखांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी द्यावी, अशी मागणी झाली. त्यावर सभागृहाने एकमुखाने या विषयाला मंजुरी दिली.विरोधी गटाच्या विजय कुंभार यांनी, राहिलेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर झिंजाड यांनी, शासनस्तरावर निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. विजयभाऊ पाटील म्हणाले, शहर हागणदारीमुक्त झाल्यानंतर जे अनुदान मिळेल, त्यातून वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान देऊ. शहरासाठी होणारा पाणी उपसा, शुध्दीकरणानंतर होणारा पाण्याचा वापर आणि त्यातील गळती रोखणे, अशा उपाययोजनांसह पाणी योजनेसाठी होणाऱ्या वीज वापराच्या आॅडिट कामाला मुदतवाढ देण्यात आली. तसेच नवीन डंपर प्लेसर खरेदीचा निर्णय झाला. आरोग्य व बांधकाम विभागाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)कर भरा : अन्यथा दंड व व्याजाची आकारणीशहरातील नागरिकांनी कर वेळेत भरुन पालिकेस सहकार्य करावे. विशेषत: थकबाकीदारांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. करवसुली कायद्यामध्ये नव्याने झालेल्या सुधारणेतून प्रत्येक महिन्याला शास्ती (व्याज) भरावे लागते. त्याचे प्रमाण जवळपास २४ टक्के इतके आहे. ही शास्ती कमी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत कर भरा, असे आवाहन मुख्याधिकारी झिंजाड यांनी केले.