शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

इस्लामला भारतातच खरे स्वातंत्र्य

By admin | Updated: May 25, 2016 23:36 IST

अब्दुल अंजारिया : मुस्लिम तरूणांच्या मनात आळवले देशप्रेम

खेड : संबंध भारतात इस्लाम आजही सुरक्षित आहे. तरीही विविध आमिषापोटी इस्लामी तरूण इसिसच्या जाळ्यात अडकत आहेत, ही चिंतेची बाब आहे. इसिस ही दहशत निर्माण करून रक्तपात घडवून आणणारी संघटना इस्लामला अजिबात मान्य नाही. इस्लाम ते कधीही खपवून घेणार नसून, ही संघटना म्हणजे इस्लाम नव्हे. यापुढे तरूणांनी या संघटनेच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन दिल्लीच्या जामा मशिदचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी येथील मुस्लिम तरूणांना केले. इस्लामला इतर देशांच्या तुलनेत भारतातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असल्याचेही ते म्हणले.इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विविध आमिषांना बळी पडून भारतातील अनेक मुस्लिम तसेच गैरमुस्लिम तरूण या संघटनेमध्ये सहभागी होत आहेत. मुस्लिम तरूणांसह सर्वधर्मीय तरूणांचे समुपदेशन करण्याच्या हेतूने दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी खेड पोलीस स्थानकात बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपस्थित तरूणांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलीस अधीक्षक डॉ. चिन्मय पंडित, खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, पोलीस निरीक्षक विकास गावडे, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष सहाय्य विभागाचे डॉ. कुलकर्णी, बाणकोटचे ज्येष्ठ नागरिक आतिफ परकार, खेड येथील मुस्लिम समाजाचे गौस खतीब यांच्यासह सुमारे १०० मुस्लिम तरूण उपस्थित होते.सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांचे स्वागत केले. डॉ. अंजारिया हे दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावर अभ्यास आहे. खेड पोलीस स्थानकात आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिम तरूणांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भारत हा देश हा मुस्लिमांसाठी कसा धर्मनिरपेक्ष आहे आणि भारतभूमीमध्ये मुस्लिम तरूण कसे सुरक्षित आहेत, याबाबत त्यांनी अनेक दाखले देत देशाचे महत्त्व पटवून दिले. धर्मनिरपेक्ष देश म्हणजेच भारत! अशा शब्दात त्यांनी आपले भारतप्रेम आळवले. त्यांनी इसिस या संघटनेबद्दल अनेक धोक्याचे इशारे दिले. या संघटनेचा इस्लामशी काहीही संबंध नाही. सध्या इंटरनेटद्वारे जग जवळ आले आहे. याचा गैरफायदा ही संघटना घेत आहे. फेसबुक, ट्वीटर आणि गुगलसारख्या सोशल मीडियामध्ये काही महत्त्वाचे मेसेज किंवा माहिती मिळवण्याच्या आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. अशावेळी या दहशतवादी संघटनेची ५ हजार तरूणांची भरती करावयाची असल्याबाबतची आणि याकरिता गडगंज पैसा मिळविण्याची हमी देणारी पोस्ट अशा सोशल मीडियावर टाकलेली असते. यासाठी काही सुंदर तरूणींचा वापर करून तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. ़विशेष म्हणजे या तरूणी अस्तित्वातच नसल्याचे प्रथम तरूणांनी लक्षात घ्यायला हवे. ही मुस्लिम तरूणांची फसवणूक असते. मात्र, चॅटिंग करतानाच फेसबुकमधील मेसेंजेरशी चॅटिंग केली जाते. ही चॅटिंग सुरू असतानाच अलगद आपला मोबाईल नंबर आणि आपल्याविषयी संपूर्ण माहिती ही संघटना हॅक करते. याद्वारे ही संघटना आपल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कडवट मेसेज पाठवते आणि हाच मेसेज व्हायरल होतो. हा मेसेज आपण इतर ग्रुपना सेंड करतो़ आणि इस्लामी तरूणांची डोकी भडकवण्याचे काम याद्वारे केले जात आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)