शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामला भारतातच खरे स्वातंत्र्य

By admin | Updated: May 25, 2016 23:36 IST

अब्दुल अंजारिया : मुस्लिम तरूणांच्या मनात आळवले देशप्रेम

खेड : संबंध भारतात इस्लाम आजही सुरक्षित आहे. तरीही विविध आमिषापोटी इस्लामी तरूण इसिसच्या जाळ्यात अडकत आहेत, ही चिंतेची बाब आहे. इसिस ही दहशत निर्माण करून रक्तपात घडवून आणणारी संघटना इस्लामला अजिबात मान्य नाही. इस्लाम ते कधीही खपवून घेणार नसून, ही संघटना म्हणजे इस्लाम नव्हे. यापुढे तरूणांनी या संघटनेच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन दिल्लीच्या जामा मशिदचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी येथील मुस्लिम तरूणांना केले. इस्लामला इतर देशांच्या तुलनेत भारतातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असल्याचेही ते म्हणले.इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विविध आमिषांना बळी पडून भारतातील अनेक मुस्लिम तसेच गैरमुस्लिम तरूण या संघटनेमध्ये सहभागी होत आहेत. मुस्लिम तरूणांसह सर्वधर्मीय तरूणांचे समुपदेशन करण्याच्या हेतूने दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी खेड पोलीस स्थानकात बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपस्थित तरूणांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलीस अधीक्षक डॉ. चिन्मय पंडित, खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, पोलीस निरीक्षक विकास गावडे, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष सहाय्य विभागाचे डॉ. कुलकर्णी, बाणकोटचे ज्येष्ठ नागरिक आतिफ परकार, खेड येथील मुस्लिम समाजाचे गौस खतीब यांच्यासह सुमारे १०० मुस्लिम तरूण उपस्थित होते.सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांचे स्वागत केले. डॉ. अंजारिया हे दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावर अभ्यास आहे. खेड पोलीस स्थानकात आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिम तरूणांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भारत हा देश हा मुस्लिमांसाठी कसा धर्मनिरपेक्ष आहे आणि भारतभूमीमध्ये मुस्लिम तरूण कसे सुरक्षित आहेत, याबाबत त्यांनी अनेक दाखले देत देशाचे महत्त्व पटवून दिले. धर्मनिरपेक्ष देश म्हणजेच भारत! अशा शब्दात त्यांनी आपले भारतप्रेम आळवले. त्यांनी इसिस या संघटनेबद्दल अनेक धोक्याचे इशारे दिले. या संघटनेचा इस्लामशी काहीही संबंध नाही. सध्या इंटरनेटद्वारे जग जवळ आले आहे. याचा गैरफायदा ही संघटना घेत आहे. फेसबुक, ट्वीटर आणि गुगलसारख्या सोशल मीडियामध्ये काही महत्त्वाचे मेसेज किंवा माहिती मिळवण्याच्या आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. अशावेळी या दहशतवादी संघटनेची ५ हजार तरूणांची भरती करावयाची असल्याबाबतची आणि याकरिता गडगंज पैसा मिळविण्याची हमी देणारी पोस्ट अशा सोशल मीडियावर टाकलेली असते. यासाठी काही सुंदर तरूणींचा वापर करून तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. ़विशेष म्हणजे या तरूणी अस्तित्वातच नसल्याचे प्रथम तरूणांनी लक्षात घ्यायला हवे. ही मुस्लिम तरूणांची फसवणूक असते. मात्र, चॅटिंग करतानाच फेसबुकमधील मेसेंजेरशी चॅटिंग केली जाते. ही चॅटिंग सुरू असतानाच अलगद आपला मोबाईल नंबर आणि आपल्याविषयी संपूर्ण माहिती ही संघटना हॅक करते. याद्वारे ही संघटना आपल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कडवट मेसेज पाठवते आणि हाच मेसेज व्हायरल होतो. हा मेसेज आपण इतर ग्रुपना सेंड करतो़ आणि इस्लामी तरूणांची डोकी भडकवण्याचे काम याद्वारे केले जात आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)