शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

इस्लामला भारतातच खरे स्वातंत्र्य

By admin | Updated: May 25, 2016 23:36 IST

अब्दुल अंजारिया : मुस्लिम तरूणांच्या मनात आळवले देशप्रेम

खेड : संबंध भारतात इस्लाम आजही सुरक्षित आहे. तरीही विविध आमिषापोटी इस्लामी तरूण इसिसच्या जाळ्यात अडकत आहेत, ही चिंतेची बाब आहे. इसिस ही दहशत निर्माण करून रक्तपात घडवून आणणारी संघटना इस्लामला अजिबात मान्य नाही. इस्लाम ते कधीही खपवून घेणार नसून, ही संघटना म्हणजे इस्लाम नव्हे. यापुढे तरूणांनी या संघटनेच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन दिल्लीच्या जामा मशिदचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी येथील मुस्लिम तरूणांना केले. इस्लामला इतर देशांच्या तुलनेत भारतातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असल्याचेही ते म्हणले.इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विविध आमिषांना बळी पडून भारतातील अनेक मुस्लिम तसेच गैरमुस्लिम तरूण या संघटनेमध्ये सहभागी होत आहेत. मुस्लिम तरूणांसह सर्वधर्मीय तरूणांचे समुपदेशन करण्याच्या हेतूने दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी खेड पोलीस स्थानकात बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपस्थित तरूणांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलीस अधीक्षक डॉ. चिन्मय पंडित, खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, पोलीस निरीक्षक विकास गावडे, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष सहाय्य विभागाचे डॉ. कुलकर्णी, बाणकोटचे ज्येष्ठ नागरिक आतिफ परकार, खेड येथील मुस्लिम समाजाचे गौस खतीब यांच्यासह सुमारे १०० मुस्लिम तरूण उपस्थित होते.सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांचे स्वागत केले. डॉ. अंजारिया हे दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावर अभ्यास आहे. खेड पोलीस स्थानकात आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिम तरूणांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भारत हा देश हा मुस्लिमांसाठी कसा धर्मनिरपेक्ष आहे आणि भारतभूमीमध्ये मुस्लिम तरूण कसे सुरक्षित आहेत, याबाबत त्यांनी अनेक दाखले देत देशाचे महत्त्व पटवून दिले. धर्मनिरपेक्ष देश म्हणजेच भारत! अशा शब्दात त्यांनी आपले भारतप्रेम आळवले. त्यांनी इसिस या संघटनेबद्दल अनेक धोक्याचे इशारे दिले. या संघटनेचा इस्लामशी काहीही संबंध नाही. सध्या इंटरनेटद्वारे जग जवळ आले आहे. याचा गैरफायदा ही संघटना घेत आहे. फेसबुक, ट्वीटर आणि गुगलसारख्या सोशल मीडियामध्ये काही महत्त्वाचे मेसेज किंवा माहिती मिळवण्याच्या आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. अशावेळी या दहशतवादी संघटनेची ५ हजार तरूणांची भरती करावयाची असल्याबाबतची आणि याकरिता गडगंज पैसा मिळविण्याची हमी देणारी पोस्ट अशा सोशल मीडियावर टाकलेली असते. यासाठी काही सुंदर तरूणींचा वापर करून तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. ़विशेष म्हणजे या तरूणी अस्तित्वातच नसल्याचे प्रथम तरूणांनी लक्षात घ्यायला हवे. ही मुस्लिम तरूणांची फसवणूक असते. मात्र, चॅटिंग करतानाच फेसबुकमधील मेसेंजेरशी चॅटिंग केली जाते. ही चॅटिंग सुरू असतानाच अलगद आपला मोबाईल नंबर आणि आपल्याविषयी संपूर्ण माहिती ही संघटना हॅक करते. याद्वारे ही संघटना आपल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कडवट मेसेज पाठवते आणि हाच मेसेज व्हायरल होतो. हा मेसेज आपण इतर ग्रुपना सेंड करतो़ आणि इस्लामी तरूणांची डोकी भडकवण्याचे काम याद्वारे केले जात आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)