शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाच म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
3
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
4
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
5
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
6
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
7
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
8
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
9
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
11
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
12
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
13
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
14
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
15
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
16
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
17
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
18
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
19
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
20
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

मोठ्या गुंतवणूकदारांचीही चौकशी

By admin | Updated: June 24, 2014 01:42 IST

‘सॅफरॉन’प्रश्नी उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीत नागरिकांना पैसे गुंतविण्यासाठी भाग पाडणाऱ्या मध्यस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण, ज्यांनी जादाचे पैसे या कंपनीत गुंतविले, ते पैसे कोठून आले, याचीही चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबाराविषयी माहिती देण्याकरिता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सहावा जनता दरबार आयोजित केला होेता. या जनता दरबारात एकूण ३० तक्रार अर्ज दाखल झाले. सध्या सॅफरॉन कंपनीतील गोंधळ गाजत आहे. रत्नागिरीकरांच्या फसवणुकीबाबत पोलिसांची भूमिका काय, असा सवाल करणारा अर्ज या जनता दरबारात सादर झाला. याबाबत पालकमंत्री म्हणाले की, या कंपनीबाबत सव्वा वर्षापूर्वी पोलिसांकडे लेखी तक्रार आली होती. मात्र, त्याबाबत कारवाई का झाली नाही, याची चौकशी होईलच. पण या कंपनीकडे पैसे गुंतविण्यासाठी ज्या मध्यस्थांनी लोकांना प्रवृत्त केले, त्यांचीही चौकशी होऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले असल्याचे सामंत म्हणाले. याप्रकरणी पोलीस आराखडा तयार करणार असून, त्यात अधिकचे पैसे भरणाऱ्यांनी ते कुठून आणले, त्याचीही चौकशी होणार असल्याची माहितीही दिली. अतिरिक्त शिक्षक बदल्यांबाबत या ३२१ शिक्षकांमध्ये तसेच ७४ निम्नशिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, ते केवळ १ मार्च २०१४ च्या अध्यादेशाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्यामुळे. परंतु या शिक्षकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यात आल्याने आता या शिक्षकांना यात संधी मिळणार आहे. तसेच ७४ निम्नशिक्षकांना तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. यासंदर्भात ३० रोजी शिक्षण उपसंचालक रत्नागिरीत येणार असून, त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचेही सामंत म्हणाले. यावेळी काही खासगी शाळा अवास्तव शुल्क वाढ करतात, अशा शाळांच्या पालकांनी रितसर तक्रार केल्यास त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले. सेतूतील प्रलंबित दाखल्यांचा निपटारा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दर आठवड्याला आता दाखल्यांच्या निपटाऱ्याबाबत आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तसेच सध्या शाळा, महाविद्यालये येथे शिबिरे घेऊन दाखले दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)