शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘त्या’ गुंतवणूकदार कंपनीची चौकशी सुरु

By admin | Updated: March 16, 2017 19:10 IST

पोलिसात तक्रारी दाखल

आॅनलाईन लोकमत

राजापूर : ग्राहकांकडून फसवणुकीच्या दाखल झालेल्या तक्रारीवरुन राजापूर पोलीसांनी शहरातील एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीची चौकशी सुरु केली असून अशा कंपनीत आपली गुंतवणूक करताना ग्राहकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी केले आहे .राजापूर शहरात आर्थिक गुंतवणूक करुन नंतर मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले असून त्यामधून तालुकावासियांची फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले असतानादेखील मागील काही दिवसांपासून राजापूर शहरात नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका कंपनीने आपले कार्यालय थाटून गुंतवणुकीला सुरवात केली आहे. यामध्ये अनेकांनी आपापली गुंतवणुक केली असून संबंधित कंपनीकडून फसवणुकीचे प्रकार घडल्याने अनेक गुंतवणुकदारांनी थेट पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत.या कंपनीचे रजिस्ट्रेशन मुंबईतील असून तिचे राजापुरात कार्यालय थाटण्यात आले आहे. काही स्थानिक मंडळींना कामावर ठेवण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून ग्राहक निवडून आर्थिक गुंतवणूक केली जात आहे, असेही पोलीसांच्या निदर्शनाला आले आहे. ग्राहकांकडून फसवणुकीच्या तक्रारी झाल्याने तालुकावासीयांनी अशा कंपनीत गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.मागील अनेक वर्षात राजापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागात अनेक कंपन्यांनी विविध नावाखाली जनतेला चुना लावला असून आणखी एका कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली शहरात फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन राजापूर पोलीसांनी चौकशीला सुरवात केली आहे. दरम्यान राजापूर पोलीसांनी त्या फसवणूकप्रकरणी तपास सुरु केला असून संबंधीतांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी दिली. संबंधीत कंपनीत गुंतवणुक करणाऱ्या नागरिकांच्या आणखी तक्रारी आल्यास त्यादेखील नोंदविल्या जाणार आहेत.(प्रतिनिधी)