शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

यांत्रिक शेतीस मिळणार चालना

By admin | Updated: January 3, 2015 00:00 IST

कृषी विकास योजना : समूहगटांना मिळणार दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य

रत्नागिरी : शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याकरिता यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात ३०० शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी गटांच्या माध्यमांतून आधुनिक यंत्रे खरेदीसाठी १० लाख रु.पर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मालगुंड, केळ्ये, राजापूर, खेड येथील चार शेतकरी गटांना मोबाईल राईस मिल देण्यात आली आहे.कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभाग व आत्मातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांना सुलभ कर्ज पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येते. या गटांच्या माध्यमातून सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. गटांच्या माध्यमातून एकत्रित उत्पन्नाबरोबरच गटातील प्रत्येक सदस्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश्य आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गट रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड या तालुक्यामध्ये आहेत.जिल्ह्यतील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे मनुष्यबळावर शेती केली जाते. परिणामी पिकांची लागवड होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट होत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांच्या धर्तीवर शेतकरी गट स्थापन करण्यात येत आहेत.शेतकरी गटाव्दारे शेतकऱ्यांना एकत्रित करुन आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.कृषी विभाग व आत्मातर्फे शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेट, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, तसेच शेतीवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येत आहे. कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तीनशे श्रेणीतील २० गटांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये टेबल, कपाट आदी साहित्य खरेदी करता येणार आहे. समूह शेतकरी गटात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे व्यक्तिगत उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)