शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

निवांत भागात रमतात नशेचे उद्योग

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

भीती वाढली : तरुण पिढीचे भवितव्य अंमली पदार्थांच्या हाती

रत्नागिरी : आंबा, काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी शहराला गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा पडत असल्याचे चित्र आहे. शहराच्या निवांत भागामध्ये अमली पदार्थांची विक्री राजरोस सुरु असून, परराज्यातून अभियांत्रिकी शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच स्थानिक तरुणही या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असून, अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भिती व्यक्त होत आहे.शैक्षणिक सुविधेबाबत रत्नागिरी आता राज्यातील महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. उच्च शिक्षणाच्या सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. नामवंत शैक्षणिक संस्था रत्नागिरीत असून, राज्यभरातून या शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. मात्र शहरालगतच असलेला औद्योगिक वसाहतीचा परिसर शांतशांत बनला असून उद्योगधंदे थंडावल्यामुळे या उद्योगांच्या इमारती आणि परिसर निर्जन बनला आहे. अंमली पदार्थ विक्रेत्यांनी नेमका याच गोष्टीचा फायदा उठवत या निर्जन ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु केल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी शहरातील काही ठराविक भागही अंमली पदार्थ विक्रीची केंद्र बनले आहेत.मध्यंतरीच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी काही औषधे, तसेच बांधकाम क्षेत्रात वापरली जाणारी काही रसायने यांचा उपयोग नशेसाठी करत असल्याचे दिसून आले होते. अजूनही हे प्रकार सुरु आहेत. त्यातच अफू, गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री सुरु झाल्याने तरुण वर्ग अंमली पदार्थांच्या जाळ्यात सापडला आहे. एम. आय. डी. सी. विभागात सायंकाळच्या वेळी निर्जन ठिकाणी तरुण फिरताना दिसून येत आहेत. तसेच अंमली पदार्थ विकणारे लोकही त्या ठिकाणी दिसून येत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. अफू व गांजा हे सिगरेटमध्ये टाकून सिगरेट ओढली जाते व नशा केली जाते, असेही आढळून आले आहे. सिगरेटमधील तंबाखू त्यासाठी काढुन टाकला जातो व त्याजागी अफू, गांजाची पावडर भरली जाते.रत्नागिरी शहर परिसरात अंमली पदार्थ विक्रीची केंद्र विकसित होत असल्याची चर्चा आहे. या केंद्रांना कोण खतपाणी घालत आहे, बाहेरील या व्यवसायातील कोणते लोक रत्नागिरीतील अंमली पदार्थ व्यवसायात गुंतले आहेत, याबाबत कधी तपास होणार आहे आणि संबंधितांवर कधी कारवाई होणार असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे. (प्रतिनिधी)अंमली पदार्थांची केंद्ररत्नागिरी शहरातील राजिवडा, बेलबाग आणि कोकणनगर हे भाग अंमली पदार्थ विक्रीची केंद्र बनली असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. अंमली पदार्थ विक्रीमध्ये केवळ पुरुषांचाच सहभाग आहे, असे नाही. तर महिलाही या बेकायदा व्यवसायात गुंतल्या आहेत. अन्य राज्यातून अफू, गांजाची आयात होत असल्याची शक्यता आहे. या अफू, गांजाची छोटी पुडी १०० रुपयांपासून पुढे ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. त्यामुळे भावी पिढी बरबाद करणाऱ्या या अंमली पदार्थांपासून तरुणांना वाचवण्यासाठी पोलिसांनी दुर्लक्षाचे धोरण सोडावे तसेच सामाजिक संस्थांनीही याबाबत कार्यवाहीसाठी पुढे येण्याची गरज आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय दरम्यानच्या परिसरात हे प्रकार सुरू असल्याचे पुढे येत असल्याने या साऱ्या प्रकाराबद्दल गुंतातगुंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.