शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीने शेतकरीही भारावून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भाताचे उत्पादन वाढले पाहिजे याकरिता भातासाठी वाढीव हमी भाव दिला आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही भाताचे लागवडीखालील क्षेत्र वाढून जादा पिकणारे भात खरेदी-विक्री संघ विकत घेणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती या वेळी बाळ माने यांनी शेतकऱ्यांना दिली. रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बावा साळवी, प्रगतशील शेतकरी मंगेश साळवी, माजी सरपंच उमंग साळवी यांच्यासह किरण घाणेकर, महादेव बेंद्रे, सुनील आंबेकर, कमलाकर जोशी, रुपेश तेरवणकर, संजय आंबेकर, विश्वास घाणेकर, विलास घाणेकर, रूपेश गार्डी, संजय राड्ये आदी उपस्थित होते.

त्यानंतर गोळप गावातील प्रगतशील शेतकरी भगवान गुरव यांच्या प्रक्षेत्रालाही माने यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थ अविनाश गुरव, मंगेश गुरव, नंदकुमार गुरव उपस्थित होते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये भात पिकावर वैविध्यपूर्ण संशोधन केले जाते. त्यामुळे या केंद्राला गोळप गावातील २५ शेतकऱ्यांची सहल आयोजित करूया, त्यातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती मिळेल आणि भातशेतीकडे उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकरी पाहू लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि विक्रमी भात उत्पादन करून त्याची विक्री झाली पाहिजे या हेतूने माने यांनी या वेळी चर्चा केली.