शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीने शेतकरीही भारावून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भाताचे उत्पादन वाढले पाहिजे याकरिता भातासाठी वाढीव हमी भाव दिला आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही भाताचे लागवडीखालील क्षेत्र वाढून जादा पिकणारे भात खरेदी-विक्री संघ विकत घेणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती या वेळी बाळ माने यांनी शेतकऱ्यांना दिली. रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बावा साळवी, प्रगतशील शेतकरी मंगेश साळवी, माजी सरपंच उमंग साळवी यांच्यासह किरण घाणेकर, महादेव बेंद्रे, सुनील आंबेकर, कमलाकर जोशी, रुपेश तेरवणकर, संजय आंबेकर, विश्वास घाणेकर, विलास घाणेकर, रूपेश गार्डी, संजय राड्ये आदी उपस्थित होते.

त्यानंतर गोळप गावातील प्रगतशील शेतकरी भगवान गुरव यांच्या प्रक्षेत्रालाही माने यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थ अविनाश गुरव, मंगेश गुरव, नंदकुमार गुरव उपस्थित होते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये भात पिकावर वैविध्यपूर्ण संशोधन केले जाते. त्यामुळे या केंद्राला गोळप गावातील २५ शेतकऱ्यांची सहल आयोजित करूया, त्यातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती मिळेल आणि भातशेतीकडे उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकरी पाहू लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि विक्रमी भात उत्पादन करून त्याची विक्री झाली पाहिजे या हेतूने माने यांनी या वेळी चर्चा केली.