शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीने शेतकरीही भारावून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भाताचे उत्पादन वाढले पाहिजे याकरिता भातासाठी वाढीव हमी भाव दिला आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही भाताचे लागवडीखालील क्षेत्र वाढून जादा पिकणारे भात खरेदी-विक्री संघ विकत घेणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती या वेळी बाळ माने यांनी शेतकऱ्यांना दिली. रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बावा साळवी, प्रगतशील शेतकरी मंगेश साळवी, माजी सरपंच उमंग साळवी यांच्यासह किरण घाणेकर, महादेव बेंद्रे, सुनील आंबेकर, कमलाकर जोशी, रुपेश तेरवणकर, संजय आंबेकर, विश्वास घाणेकर, विलास घाणेकर, रूपेश गार्डी, संजय राड्ये आदी उपस्थित होते.

त्यानंतर गोळप गावातील प्रगतशील शेतकरी भगवान गुरव यांच्या प्रक्षेत्रालाही माने यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थ अविनाश गुरव, मंगेश गुरव, नंदकुमार गुरव उपस्थित होते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये भात पिकावर वैविध्यपूर्ण संशोधन केले जाते. त्यामुळे या केंद्राला गोळप गावातील २५ शेतकऱ्यांची सहल आयोजित करूया, त्यातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती मिळेल आणि भातशेतीकडे उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकरी पाहू लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि विक्रमी भात उत्पादन करून त्याची विक्री झाली पाहिजे या हेतूने माने यांनी या वेळी चर्चा केली.