शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रकल्प : बी. आर. चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नजिकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी. आर. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नजिकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी. आर. चव्हाण यांच्या १ कोटी ७८ लाख ९१ लाख ४३८ रूपयांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक संशोधन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील हा पहिलाच प्रकल्प आहे. यासंदर्भात डॉ. बी. आर. चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.

प्रश्न : या प्रकल्पामागचा प्रमुख उद्देश कोणता?

उत्तर : कोकण विभागातील अनुसूचित जाती समूहातील लोकांना स्वयंरोजगार मिळून देण्याबरोबरच त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा, हा या प्रकल्पामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यादृष्ष्टीने तीन वर्षांकरिता हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

प्रश्न : या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर : दुर्लक्षित जलस्रोत/जलाशयात जर शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंवर्धन केले तर नक्कीच मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यादृष्टीने प्रकल्पांतर्गत जलाशयामध्ये पिंजऱ्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरून शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळेच राष्ट्रपती यांच्या मान्यतेने हा प्रकल्प भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून मंजूर झाला आहे.

प्रश्न : हा प्रकल्प कसा राबविला जाणार?

उत्तर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ४० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. त्यांनी जागा आणि पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यांच्या जागेवर प्रकल्प उभारले जाणार असून, या प्रकल्पाचा खर्च शासनाच्या या निधीतून हाेणार आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

प्रश्न : प्रकल्पारंभ कधी होणार?

उत्तर : सध्या प्राथमिक तयारी सुरू आहे. सर्व ठिकाणी प्रकल्पांची जागा, पाणी आदी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहत आहे. यासाठी लोकांची मेहनत महत्त्वाची असून, प्रकल्प नक्की यशस्वी हाेईल.

कोकणातील तीन जिल्ह्यांत राबविणार

हा प्रकल्प रत्नागिरी, सिंधुुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांत राबविला जाणार आहे. पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन लांजा तालुक्यातील झापडे येथील धरणावर राबविण्यात येणार आहे. तर बायोफ्लाॅक तंत्रज्ञान वापरून पाली (ता. रत्नागिरी) आणि गवाणे (ता. लांजा), सिंधुदुर्गमध्ये मालवण तालुक्यातील पेंडूर आणि कांदळगाव तर रायगड जिल्ह्यात मुठावली (ता. रोहा) येथे राबविला जाणार आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे तसेच मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे आणि विभागप्रमुख सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. बी. आर. चव्हाण हे काम पाहणार आहेत. डाॅ. राहुल सदावर्ते, डाॅ. हरिष धमगाये, डाॅ. हणमंते, डाॅ. संदीप पाटील हे प्रकल्प उपप्रमुख आहेत.